शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील समुद्रात डांबराच्या गुठळ्या, गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय

By अरुण आडिवरेकर | Updated: September 23, 2022 16:40 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. या गुठळ्या गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.रत्नागिरी कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरी ते गोवा रेकी करण्यात आली. रत्नागिरी ते गोवा या दोन तासांच्या सोर्टीमध्ये तेल प्रदूषणाचा कोणताही गंभीर धोका आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यापासून ७-८ मैल अंतरावर तेलाचा पातळ थर आढळला असून, त्याची स्वत:हून बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, अपघात ग्रस्त ‘पार्थ’ तेलवाहू जहाजामधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाली आहे. राजापूर तालुक्यातील साखरीनाटे - आंबोलगड - वेत्ये - किनाऱ्यासमोर १८ वाव खोल समुद्रात दोन दिवसापासून ठिकठिकाणी डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या डांबराच्या गुठळ्या गावखडीपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे.रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या डांबराच्या गुठळ्याबाबत मच्छिमारांनी मत्स्य खात्याला माहिती दिली आहे. त्यानंतर सारी यंत्रणा सतर्क झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार