शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

LPG गॅस टँकर नदीत कोसळला; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:58 IST

या टँकरमधून होणाऱ्या गॅसगळतीमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या अंजनारी पुलावरील वाहतूक अद्यापही ठप्प असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या १५ हून अधिक तासांपासून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांज्याजवळील पुलावरून एलपीजी गॅस टँकर नदीत कोसळल्याने या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅसगळती थांबल्यानंतरच याठिकाणी वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यत पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. 

गुरुवारी दुपारी ३-४ च्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पूलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा टँकर नदीत कोसळला. अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होऊ लागल्याने याठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. जोपर्यंत गॅस बाहेर सुरक्षित काढला जात नाही तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. मागील १५ हून अधिक तासांपासून ही वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

दरम्यान या टँकरमधून होणाऱ्या गॅसगळतीमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही असं स्थानिकांनी म्हटलं. तर गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम लवकरच घटनास्थळी दाखल होईल. तज्ज्ञांच्या मदतीनं अपघातग्रस्त टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. मात्र या प्रक्रियेला किती वेळ जाईल हे सांगता येत नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. 

पर्यायी मार्गानं वाहतूक वळवलीअंजनारी पुलावरील वाहतूक बंद असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी पुणस, काजगघाटी, रत्नागिरी, तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनी शिपोली, पाली, दाभोळे या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाने केले आहे.