शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

गतवर्षीपेक्षा कमी, तरी झळ कायम

By admin | Updated: May 10, 2016 02:28 IST

प्रत्यक्षात आकडा हजारात : तब्बल ५४ गावांतील ९८ वाड्यांना पाणीटंचाईने घातलाय विळखा

रहिम दलाल --रत्नागिरी जिल्ह्यात टंचाईग्रस्त १२,२०९ लोकांची शासन दरबारी नोंद असली तरी प्रत्यक्षात लाखभर लोकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. आज जिल्ह्यात ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने विळखा घातला आहे. जिल्ह्यातील अनेक वाड्या अजूनही तहानलेल्या आहेत. उन्हाळ्यात या वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली की, यावर तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर किती वर्षे तहान भागवणार? या वाडी - वस्त्यांची कायमची तहान भागवण्यासाठी पाण्याचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. पाणीटंचाईला सामोरे जाणारे लोक भीषण वास्तव नीमूटपणे सहन करत आहेत. जिल्ह्यात एप्रिल २०१६मध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागतो. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात खासगी विहिरींचे मालक पाणी विक्रीचा व्यवसाय करीत असून, दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहेत. गेल्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, पाणीटंचाईची तीव्रता गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. कमी पावसामुळे यावर्षी पाणीटंचाई तीव्र होणार असे वाटत होते. ग्रामीण भागामध्ये उभारलेल्या सुमारे ५००० बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईच्या झळा कमी बसत आहेत. मात्र, कच्चे बंधारे, विहिरी, नद्या, नाले, तलाव आटल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी आजच्या दिवशी ६० गावातील १२२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई होती. यंदा त्यापेक्षा कमी गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यात १० गावांतील २३ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे आज ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या टंचाईग्रस्तांना शासकीय १० आणि खासगी ४ अशा एकूण १४ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. आतापर्यंत या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सद्वारे ७४७ फेऱ्या मारल्या आहेत. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्या डोंगराळ भागात असल्याने पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते.पाणीटंचाईचा फटका १२,२०९ लोकांना बसला असल्याची नोंद शासन दरबारी असली तरी प्रत्यक्ष लाखभर लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. अनेक गावांतील विहिरी, तलाव, विंधन विहिरी, पाण्याचे स्रोत आटल्याने लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.