शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

गतवर्षीपेक्षा कमी, तरी झळ कायम

By admin | Updated: May 10, 2016 02:28 IST

प्रत्यक्षात आकडा हजारात : तब्बल ५४ गावांतील ९८ वाड्यांना पाणीटंचाईने घातलाय विळखा

रहिम दलाल --रत्नागिरी जिल्ह्यात टंचाईग्रस्त १२,२०९ लोकांची शासन दरबारी नोंद असली तरी प्रत्यक्षात लाखभर लोकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. आज जिल्ह्यात ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने विळखा घातला आहे. जिल्ह्यातील अनेक वाड्या अजूनही तहानलेल्या आहेत. उन्हाळ्यात या वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली की, यावर तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर किती वर्षे तहान भागवणार? या वाडी - वस्त्यांची कायमची तहान भागवण्यासाठी पाण्याचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. पाणीटंचाईला सामोरे जाणारे लोक भीषण वास्तव नीमूटपणे सहन करत आहेत. जिल्ह्यात एप्रिल २०१६मध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागतो. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात खासगी विहिरींचे मालक पाणी विक्रीचा व्यवसाय करीत असून, दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहेत. गेल्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, पाणीटंचाईची तीव्रता गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. कमी पावसामुळे यावर्षी पाणीटंचाई तीव्र होणार असे वाटत होते. ग्रामीण भागामध्ये उभारलेल्या सुमारे ५००० बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईच्या झळा कमी बसत आहेत. मात्र, कच्चे बंधारे, विहिरी, नद्या, नाले, तलाव आटल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी आजच्या दिवशी ६० गावातील १२२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई होती. यंदा त्यापेक्षा कमी गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यात १० गावांतील २३ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे आज ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या टंचाईग्रस्तांना शासकीय १० आणि खासगी ४ अशा एकूण १४ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. आतापर्यंत या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सद्वारे ७४७ फेऱ्या मारल्या आहेत. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्या डोंगराळ भागात असल्याने पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते.पाणीटंचाईचा फटका १२,२०९ लोकांना बसला असल्याची नोंद शासन दरबारी असली तरी प्रत्यक्ष लाखभर लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. अनेक गावांतील विहिरी, तलाव, विंधन विहिरी, पाण्याचे स्रोत आटल्याने लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.