शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खेड वादळातील नुकसान वाढले

By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST

यंत्रणा सतर्क : घरं, गोठा, समाजमंदिराला फटका

खेड : तालुक्यातील वीस दिवसांपूर्वी झालेल्या वादळात ७४८ नुकसानग्रस्तांची ४४ लाख ६६,३८६ रुपयांची हानी झाली असल्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील १६६हून अधिक गावांना त्याचा फटका बसला होता. अवकाळी वादळी पावसामुळे फळझाडे व मोठे वृक्ष यांची पडझड होऊन घरे, गोठा, शौचालये, शाळा, चक्की, दुकान, देऊळ, अंगणवाडी, बेकरी, हॉटेल समाजमंदीर, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानशेड यांना नुकसानीचा फटका बसला होता. सुरुवातीला ५५ गावांतील ६१० आपद्ग्रस्तांचे ३३ लाख २६ हजार ९१६ रुपयांचे नुकसान झाले होते. उर्वरित नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी त्यावेळी अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र पंचनामे झाल्यानंतर त्यात साडेअकरा लाखांनी वाढ झाली आहे. अंशत: नुकसान झालेल्या ६६५ घरांचे ३० लाख ८२ हजार २८, पूर्ण घरांचे १ लाख ७२ हजार १०, अंशत: नुकसान झालेल्या ४० गोठ्यांचे १ लाख २४ हजार ४१९ रुपये, ९ दुकानांचे २ लाख ७८ हजार ७६० रुपये, शौचालय, शाळा, देऊळ, बेकरी, कंपनी, स्मशानशेड, समाजमंदीर, ग्रामपंचायत कार्यालय, गिरण यांचे ८ लाख २० हजार १६९ रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस अवेळी पडला व पहिल्या अवकाळी पावसाने सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासकीय यंत्रणेने चोख काम बजवावे अशी मागणीही तालुक्यातून होत आहे. महसुली नुकसानीचा आकडा तयार झाला असला मदत त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचवावी असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)