शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

खेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:19 IST

खेड तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देखेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी खेड तालुक्यात पंचनामे पूर्ण, ४ हजार ८०० शेतकरी बाधित

खेड : तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या होत्या; परंतु अवकाळी पावसामुळे हे भातपीक शेतजमिनीत गाडले गेल्याने तयार भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील शेतीची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.

तालुक्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ९ हजार ९८१ हेक्टर ४० गुंठे क्षेत्र आले होते. यामधील १ हजार ५५६ हेक्टर १९ गुंठे क्षेत्र बाधित झाले आहे. या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात ३२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १४४ शेतकरी बाधित झाले आहेत.मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, एकूण १ हजार ५२४ हेक्टर १९ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले असून, तब्बल ४ हजार ६५६ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या कालावधीत वादळी वारा व पाऊस यामुळे कापणीसाठी तयार झालेली पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही थोडेफार मिळेल, या आशेने पिकांची कापणी केली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने कापणी केलेली पिके पाण्यात भिजून तरंगू लागली होती. ते भात आता जनावरांसाठीही निरूपयोगी झाले आहे.ओला दुष्काळभातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२०मध्ये घेतलेले कर्ज माफ करावे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. खेड तालुक्यातील २० शेतकऱ्यांचा ८ हेक्टर ९२ गुंठे क्षेत्राचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. त्याची अमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा होत आहे.कर्जमाफीसह सरसकट भरपाईची अपेक्षाऑगस्ट महिन्यात संततधार पावसामुळे नदीकाठच्या चिंचघर, शिर्शी, भडगाव, खारी, नांदगाव, सुसेरी क्रमांक.१, सुसेरी क्रमांक २, बहिरवली, चिंचवली, उधळे, बोरघर आदी गावातील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. शेतात आठ ते दहा दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली होती. तेव्हाच्या नुकसानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड