शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले; हा घ्या पुरावा
2
India Pakistan War : पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजू लागला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
5
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
6
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
7
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
8
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
9
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
10
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
11
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
12
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
13
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
14
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
15
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
16
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
17
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
18
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
19
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
20
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

चिनी वस्तंूद्वारे ग्राहकांची लूट

By admin | Updated: November 15, 2015 23:51 IST

रत्नागिरी शहर : बिल देण्यास टाळाटाळ; स्वस्ताईचे आमिष दाखवून भरमसाठ किंमती

रत्नागिरी : एकीकडे स्वदेशीचा पुरस्कार करत असताना बाजारात चिनी वस्तूंनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. मात्र, या वस्तूंच्या किंमती भरमसाठ ठेवल्याने व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी वस्तूचे बिल मागितल्यास त्यांना ते देण्यात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार रत्नागिरीत घडत आहेत.भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंनी आता गिळंकृत केली आहे. मुक्त व्यापारी धोरणामुळे परकीय राष्ट्रांसाठी भारतीय बाजारपेठ आता कुरण बनली आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंमुळे कसबी कारागीर बेकार झाले आहेत. हस्त वस्तूंच्या किंमती परवडत नसल्याने त्यांची मागणी रोडावली आहे. मात्र, त्या कारागीरांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाजारात येणाऱ्या वस्तूंवर मेड इन चायना किंवा मेड इन जपान असा शिक्का मारलेलाच असतो. त्यामुळे भारतीय वस्तू आहेत कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. या वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्राहक त्यांना अधिक पसंती देत आहे, पण या वस्तूंच्या दर्जाबाबत कोणीच बोलू शकत नाही. दुकानात घेतलेली वस्तू दुकानातून बाहेर पडल्यानंतर नादुरूस्त झाल्यास आपण काहीच करू शकत नाही.बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईल्स, गृहोपयोगी वस्तू चायना मेड असल्याने त्यांच्या किंमती कमी आहेत. मुळातच या वस्तू अत्यल्प किंमतीला दुकानदारांना मिळत आहे. त्यांनी आपल्या दुकानात या वस्तू ठेवल्यानंतर त्यांच्या भरमसाठा किंमती ठेवल्या जात आहेत. रत्नागिरी शहरातदेखील चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यावर आकर्षक गिफ्ट ठेवून ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वस्तू खरेदी केल्यानंतर या वस्तूंचे बिल मागतल्यास दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘वस्तू पाहिजे तर घ्या’ असे सांगून ग्राहकांना परत पाठविले जाते. ही वस्तू घेतल्यानंतर त्यात बिघाड झाल्यास काहीच करू शकत नाही. चिनी बनावटीच्या वस्तुंमुळे होणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक मंचाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)नो गॅरंटी : ग्राहक मंच सुस्तावलेलाग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक मंच कार्यरत आहे. पण, हा मंच केवळ ग्राहकांनी तक्रार दिली तरच त्याची दखल घेत आहे. जोपर्यंत तक्रार नाही तोपर्यंत कारवाई नाही, असा होरा असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक मंच बघ्याची भूमिका घेत आहे. ग्राहक मंचाकडून दुकानांवर धाडी टाकण्याचे प्रकार होत नसल्याने शहरातील दुकानदार निर्ढावलेले आहेत.‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत ग्राहकांना जागरूक होण्याचा उपदेश शासक देत आहेत. शासनाच्या या धोरणानुसार अनेक ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडे त्याचे बिल मागत आहे. मात्र, हे बिल देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असून, या मालाची ‘नो गॅरंटी’ असल्याचे सांगून ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. विकलेल्या मालाची कोणतीच हमी देण्यास दुकानदार तयार नसतो.मूळ किंमत कमीचिनी वस्तू अल्प दरात विकल्या जात असल्याचे भासविले जाते. मुळातच या वस्तूंची किंमत खूपच कमी असते. पण त्या भरमसाठ किमतीने विकतात.