शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
5
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
6
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
7
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
8
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
9
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
10
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
11
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
12
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
13
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
14
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
15
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
16
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
17
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
18
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
19
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
20
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

चिनी वस्तंूद्वारे ग्राहकांची लूट

By admin | Updated: November 15, 2015 23:51 IST

रत्नागिरी शहर : बिल देण्यास टाळाटाळ; स्वस्ताईचे आमिष दाखवून भरमसाठ किंमती

रत्नागिरी : एकीकडे स्वदेशीचा पुरस्कार करत असताना बाजारात चिनी वस्तूंनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. मात्र, या वस्तूंच्या किंमती भरमसाठ ठेवल्याने व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी वस्तूचे बिल मागितल्यास त्यांना ते देण्यात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार रत्नागिरीत घडत आहेत.भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंनी आता गिळंकृत केली आहे. मुक्त व्यापारी धोरणामुळे परकीय राष्ट्रांसाठी भारतीय बाजारपेठ आता कुरण बनली आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंमुळे कसबी कारागीर बेकार झाले आहेत. हस्त वस्तूंच्या किंमती परवडत नसल्याने त्यांची मागणी रोडावली आहे. मात्र, त्या कारागीरांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाजारात येणाऱ्या वस्तूंवर मेड इन चायना किंवा मेड इन जपान असा शिक्का मारलेलाच असतो. त्यामुळे भारतीय वस्तू आहेत कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. या वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्राहक त्यांना अधिक पसंती देत आहे, पण या वस्तूंच्या दर्जाबाबत कोणीच बोलू शकत नाही. दुकानात घेतलेली वस्तू दुकानातून बाहेर पडल्यानंतर नादुरूस्त झाल्यास आपण काहीच करू शकत नाही.बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईल्स, गृहोपयोगी वस्तू चायना मेड असल्याने त्यांच्या किंमती कमी आहेत. मुळातच या वस्तू अत्यल्प किंमतीला दुकानदारांना मिळत आहे. त्यांनी आपल्या दुकानात या वस्तू ठेवल्यानंतर त्यांच्या भरमसाठा किंमती ठेवल्या जात आहेत. रत्नागिरी शहरातदेखील चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यावर आकर्षक गिफ्ट ठेवून ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वस्तू खरेदी केल्यानंतर या वस्तूंचे बिल मागतल्यास दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘वस्तू पाहिजे तर घ्या’ असे सांगून ग्राहकांना परत पाठविले जाते. ही वस्तू घेतल्यानंतर त्यात बिघाड झाल्यास काहीच करू शकत नाही. चिनी बनावटीच्या वस्तुंमुळे होणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक मंचाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)नो गॅरंटी : ग्राहक मंच सुस्तावलेलाग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक मंच कार्यरत आहे. पण, हा मंच केवळ ग्राहकांनी तक्रार दिली तरच त्याची दखल घेत आहे. जोपर्यंत तक्रार नाही तोपर्यंत कारवाई नाही, असा होरा असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक मंच बघ्याची भूमिका घेत आहे. ग्राहक मंचाकडून दुकानांवर धाडी टाकण्याचे प्रकार होत नसल्याने शहरातील दुकानदार निर्ढावलेले आहेत.‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत ग्राहकांना जागरूक होण्याचा उपदेश शासक देत आहेत. शासनाच्या या धोरणानुसार अनेक ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडे त्याचे बिल मागत आहे. मात्र, हे बिल देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असून, या मालाची ‘नो गॅरंटी’ असल्याचे सांगून ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. विकलेल्या मालाची कोणतीच हमी देण्यास दुकानदार तयार नसतो.मूळ किंमत कमीचिनी वस्तू अल्प दरात विकल्या जात असल्याचे भासविले जाते. मुळातच या वस्तूंची किंमत खूपच कमी असते. पण त्या भरमसाठ किमतीने विकतात.