शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

नोकरीच्या आमिषातून लाखो रूपयांची लूट

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

रत्नागिरी जिल्हा : दोन वर्षात लाखोंची फसवणूक झाल्याचे उघड

आकाश शिर्के -- रत्नागिरी -चांगल्या पगाराची नोकरी लावतो... १० लाख भरा आणि जॉईनिंग लेटर हातात घ्या... असे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे. वारंवार जनजागृती करूनसुध्दा अनेकजण आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शहरामध्ये सहाजणांची १४ लाख ४० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये एक गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.शहरामध्ये फसवणुकीचे गुन्हे एकामागोमाग पुढे येत आहेत. त्यामध्ये सायबर गुन्हे, समोरा-समोरील झालेला करार अशा माध्यमातून फसवणूक केली जात आहे. शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या अधिक आहे. उच्च शिक्षण घेऊनही या मुलांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ही मुले नोकरीच्या आमिषाला बळी पडत आहेत. रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण घेऊनही घरात बसलेल्या तरूणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निराश झालेले हे तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. परंतु नोकरी मिळत नसल्याने आमिषाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेतात. एखादी अनोळखी व्यक्ती फोनवरून बँकेतून वा कंपनीतून फोन लावून या मुलांना नोकरीला लावतो, दहा लाख भरा आणि नोकरीवर हजर होण्याबाबतचे पत्र त्वरित घ्या, अशी आमिषे दाखवतात. सन २०१५मध्ये शहर पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाले होते. २ जानेवारी २०१५ रोजी त्यामध्ये सर्वांत मोठा गंडा माजी नगरसेविका नाझनीन हकीम यांना बसला होता. मुंबई येथील एका नामांकीत महाविद्यालयात क्लार्कची नोकरी लावतो, असे सांगून १० लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर दुसरा प्रकार प्रशांत नेरूलकर, रवींद्र खंडागळे व योगेश या तिघांच्या बाबतीत घडला होता. या तिघांना तटरक्षक दलात कामाला लावतो, असे सांगून ३ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली होती.सन २०१६मध्ये फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये नोकरीला लावतो, असे सांगून अमित दीक्षित याला ५० हजार २०० रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. बँकेत नोकरी आहे. तुम्ही त्यासाठी इच्छूक आहात का, असे सांगून भूषण सुर्वे यांच्या २८००० रुपयांना चुना लावण्यात आला होता. असे मिळून दोन वर्षात १४ लाख ४० हजार २०० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)काही महिन्यांपूर्वी पती-पत्नीला कृषी कार्यालयात व पत्नीला नर्सेसची नोकरी लावतो, असे सांगून १० लाखांची फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. हातात पैसे देऊन नोकरीवर हजर होण्याचे लेटर न मिळाल्यामुळे आपण फसलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.फसवणुकीचे गुन्हे थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही अनेक लोक या आमिषांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. रत्नागिरीच्या माजी नगरसेविका नाझनीन हकीम यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करून हकीम यांचा काही मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. परंतु बाकीचे पाच गुन्हे शिल्लक असून, या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास युध्दपातळीवर सुरू आहे. फसवणुकीच्या या गुन्ह्यांची वाढती व्याप्ती पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.