शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

सावकारी पाशात होतेय कर्जदारांची तडफड

By admin | Updated: April 29, 2016 00:27 IST

जमिनीही हडप? : विनापरवाना शेकडो सावकरांचे बस्तान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ३६ असली तरी प्रत्यक्षात शेकडो विनापरवाना सावकार कार्यरत असून, त्यांनी बेकायदेशीररित्या अनेकांना दिलेल्या कर्जावर चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारणी होत आहे. त्यामुळे अशा बेकायदा सावकारांच्या पाशात सर्वसामान्य कर्जदारांची तडफड सुरू आहे. अशा कर्जदारांकडे पठाणी पध्दतीने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असून, काहींच्या जमिनीही हडप केल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी परवानाधारक सावकारांची संख्या २४ होती. त्यानंतर ३१ मार्च २०१६ला हीच संख्या २४वरून ३६ पर्यंत पोहोचली आहे. चिपळूण व रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या काही अन्य भागातही बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या पाशात कर्जदारांची कुतरओढ सुरू आहे. त्यामुळे चक्रवाढ व्याज लावून वसुलीचा तगादा लावणाऱ्या विनापरवाना सावकारांच्या विरोधात आता त्रस्त कर्जदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ३६ आहे. त्यात रत्नागिरीतील २९ आणि चिपळुणातील ७ सावकारांचा समावेश आहे. परवानाधारक सावकार हे या दोन तालुक्यातीलच आहेत. याचा अर्थ अन्य तालुक्यात सावकारी नाही, असा नाही. बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे जाळे राजापूरपासून थेट मंडणगडपर्यंत पसरले आहे. जिल्ह्यात केवळ ३६ परवानाधारक सावकारांना संपूर्ण कर्ज व्यवहार हा पारदर्शक ठेवावा लागतो. त्याची वेळोवेळी तपासणीही केली जाते. कोणा कर्जदारावर अन्याय होत नाही ना, याचीही पाहणी केली जाते. त्यामुळेच बॅँकांव्यतिरिक्त परवानाधारक सावकारांकडून कर्ज घ्यावे, विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असे आवाहन जिल्हा सहकार निबंधक कार्यलयाकडूनही वारंवार करण्यात येते. तरीही बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. अशा बेकायदा सावकारांनी कर्ज दिल्यानंतर कर्जदारांचा छळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत. मात्र, त्यांच्या त्रासाबाबत खात्याकडे कोणाच्याही तक्रारी येत नसल्याने अशी बेकायदा सावकारी मोडून काढणे शक्य होत नसल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्हा : परवानाधारक सावकारांची यादी.वासुदेव रामचंद्र नार्वेकर, प्रवीण महेंद्र जैन, दिनेश प्रेमजी भणसारी, गोविंद दिनेश गजरा, राजेश दिनकर भुर्के, मे. एस. पी. फायनान्स, विजय शांताराम बार्इंग, हरेश दिनेश गजरा, मंदार दीपक खेडेकर, वैभवी विजय खेडेकर, राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर, अवधूत किसन शिंदे, मुकेश दत्ताराम मिरकर, संदीप दिवाकर प्रभू, प्रिया प्रसाद खेडेकर, परशुराम प्रभाकर ढेकणे, लीना गजेंद्र शिर्के, कृष्णांत मोहनराव गायकवाड, अनिल लहू घोसाळे, सुनील प्रभाकर रसाळ, पवन प्रकाश रसाळ, नीलेश शिवाजी कीर, निखील सुनील सावंत, सचिन भिकाजी रायकर, संजय भिकूशेठ हळदणकर, महेंद्र धर्माजी गवळी, शीतल सुजित कीर, दिनेश वसंत राठोड, अशोक अमोल पिलणकर (सर्व रा. रत्नागिरी.) अजय अनंत देवधर, एन. नटरायन, प्रशांत प्रदीप देवळेकर, नितेश माणिकचंद ओसवाल, उदय जयसिंग देसाई, विजय धनंजय जठार, प्रमोद राजाराम गोपाळ (सर्व रा. चिपळूण).