शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर

By admin | Updated: October 17, 2014 00:40 IST

पर्यटन महामंडळ : निवास न्याहरी योजनेबाबत विभागवार बैठका-लोकमतचा प्रभाव

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -पर्यटन व्यवसायाच्या विस्ताराबरोबरच कोकणात काही अपप्रवृत्तींचाही शिरकाव होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या निवास न्याहरी योजनाधारकांनी योग्य सुरक्षा व्यवस्था केलेय की नाही, पर्यटकांबाबत योग्य नोंदी ठेवल्यात की नाहीत, याबाबत करडी नजर ठेवली जाणार आहे. या दिवाळीनंतर दोन्ही जिल्ह्यात योजनाधारकांच्या विभागवार बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यात सुरक्षाविषयक काय व कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुहागर येथे गेल्या पंधरवड्यात कासवमित्र विश्वास खरे यांचा प्लेझर पॉइंट या त्यांच्या पर्यटक निवासस्थानात राहायला आलेल्या पर्यटकांनी खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या निवास न्याहरी योजनेतील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. गुहागरमध्ये जो प्रकार घडला तो गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळेच पर्यटन व्यवसायात असलेल्या लॉजिंग, निवास न्याहरी यांसारख्यांना सुरक्षाविषयक दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. याआधी निवास न्याहरी योजनाधारकांना दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करावे लागत होते. परिणामी दरवर्षी त्यांनी ठेवलेल्या नोंदी तपासणे, योजनेची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करणे शक्य होत असे. आता पहिल्या नोंदणीनंतर पुन्हा वर्षभराने दिला जाणारा नोंदणी परवाना हा पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था व अन्य नियमांचे तंतोतंत पालन केले जाते की नाही, याची पाहणी करण्यासाठी पर्यटन महामंडळाला तशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. तसेच दरवर्षी वा सहा महिन्यातून एकदा किंवा अचानकपणे सुरक्षाविषयक आढावा घेण्याबाबतही विचार होऊ शकतो. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे ते म्हणाले. निवासी न्याहरी योजनेत पर्यटकांची सुरक्षितता हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गणपतीपुळे, दापोली, गुहागर तसेच ज्या भागात योजनाधारक अधिक आहेत त्या ठिकाणी अशा मागर्दशन सभा घेण्यात येतील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रत्येकी तीन ते चार सभा होतील. त्याबाबतचे नियोजन केले जात असून, दिवाळीनंतर या सभा घेतल्या जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)