शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 ५७ टक्के उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:51 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे.

ठळक मुद्देमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी या पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या १६ लोकसभांमध्ये ५७ टक्के उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे.

अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते. सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते, हा आजवरचा अनुभव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार होते. अपक्षांची हीच सर्वात मोठी संख्या. रत्नागिरीमध्ये आजवरच्या १६ निवडणुकांपैकी दोनवेळा (१९५७, ७७) दुरंगी लढती झाल्या. दोनवेळा (१९७१, ९९) तिरंगी लढती झाल्या. तीनवेळा (१९५२, ६२, २००४) चौरंगी लढती झाल्या. १९६७, ८०, ८४, ८९, ९१, ९६, ९८, २००९ आणि २०१४ अशा नऊवेळा बहुरंगी लढती झाल्या आहेत. एकूण ८१ उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यातील ४६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

१९६७ सालची निवडणूक वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये विजयी आणि त्याच्याशी प्रमुख लढत झालेला पराभूत असे दोन उमेदवार वगळता इतर सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १९६७ साली काँग्रेसच्या शारदा मुखर्जी आणि त्यांचे प्रमुख विरोधक भारतीय जनसंघाचे ए. जी. कळसकर यांच्याखेरीज केवळ के. जी. पवार हे एकमेव अपक्ष उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

दोनवेळा दुरंगी लढत

१९५७ साली जनसंघाकडून प्रेमजीभाई आसर आणि काँग्रेसकडून जगन्नाथ भोसले तसेच १९७७ साली भारतीय लोक दलाचे बापूसाहेब परूळेकर आणि काँग्रेसकडून शामराव पेजे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.

किती लागतात मते?

एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग