शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

Lok Sabha Election 2019 ५७ टक्के उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:51 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे.

ठळक मुद्देमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी या पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या १६ लोकसभांमध्ये ५७ टक्के उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे.

अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते. सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते, हा आजवरचा अनुभव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार होते. अपक्षांची हीच सर्वात मोठी संख्या. रत्नागिरीमध्ये आजवरच्या १६ निवडणुकांपैकी दोनवेळा (१९५७, ७७) दुरंगी लढती झाल्या. दोनवेळा (१९७१, ९९) तिरंगी लढती झाल्या. तीनवेळा (१९५२, ६२, २००४) चौरंगी लढती झाल्या. १९६७, ८०, ८४, ८९, ९१, ९६, ९८, २००९ आणि २०१४ अशा नऊवेळा बहुरंगी लढती झाल्या आहेत. एकूण ८१ उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यातील ४६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

१९६७ सालची निवडणूक वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये विजयी आणि त्याच्याशी प्रमुख लढत झालेला पराभूत असे दोन उमेदवार वगळता इतर सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १९६७ साली काँग्रेसच्या शारदा मुखर्जी आणि त्यांचे प्रमुख विरोधक भारतीय जनसंघाचे ए. जी. कळसकर यांच्याखेरीज केवळ के. जी. पवार हे एकमेव अपक्ष उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

दोनवेळा दुरंगी लढत

१९५७ साली जनसंघाकडून प्रेमजीभाई आसर आणि काँग्रेसकडून जगन्नाथ भोसले तसेच १९७७ साली भारतीय लोक दलाचे बापूसाहेब परूळेकर आणि काँग्रेसकडून शामराव पेजे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.

किती लागतात मते?

एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग