शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 ५७ टक्के उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:51 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे.

ठळक मुद्देमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी या पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या १६ लोकसभांमध्ये ५७ टक्के उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे.

अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते. सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते, हा आजवरचा अनुभव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार होते. अपक्षांची हीच सर्वात मोठी संख्या. रत्नागिरीमध्ये आजवरच्या १६ निवडणुकांपैकी दोनवेळा (१९५७, ७७) दुरंगी लढती झाल्या. दोनवेळा (१९७१, ९९) तिरंगी लढती झाल्या. तीनवेळा (१९५२, ६२, २००४) चौरंगी लढती झाल्या. १९६७, ८०, ८४, ८९, ९१, ९६, ९८, २००९ आणि २०१४ अशा नऊवेळा बहुरंगी लढती झाल्या आहेत. एकूण ८१ उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यातील ४६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

१९६७ सालची निवडणूक वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये विजयी आणि त्याच्याशी प्रमुख लढत झालेला पराभूत असे दोन उमेदवार वगळता इतर सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १९६७ साली काँग्रेसच्या शारदा मुखर्जी आणि त्यांचे प्रमुख विरोधक भारतीय जनसंघाचे ए. जी. कळसकर यांच्याखेरीज केवळ के. जी. पवार हे एकमेव अपक्ष उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

दोनवेळा दुरंगी लढत

१९५७ साली जनसंघाकडून प्रेमजीभाई आसर आणि काँग्रेसकडून जगन्नाथ भोसले तसेच १९७७ साली भारतीय लोक दलाचे बापूसाहेब परूळेकर आणि काँग्रेसकडून शामराव पेजे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.

किती लागतात मते?

एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग