शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 17:38 IST

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज

अरबी समुद्रात तयार झालेल्या 'निसर्ग'  चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातल्या अनेक गावांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये, मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी 'लोकसाधना' ही सामाजिक संस्थाही त्याला अपवाद नाही. संस्थेच्या महाविद्यालयाच्या 'लोकनिर्माण भवन' या इमारतीची या वादळात वाताहत झाली आहे.३० किलो वजनाचे चिरे भिंतीतून सुटून दूरवर जाऊन पडले, इतका वाऱ्याचा जोर जबरदस्त होता", अशी माहिती संस्थेचे विश्वस्त ऍड. कैवल्य दांडेकर यांनी दिली आहे. त्याखेरीज ग्रंथालय, आमराई तसेच संस्थेने गावासाठी उभारलेल्या बसथांब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपासच्या अनेक गावांमध्ये घरांचे व झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे मनुष्यबळ कमी उपलब्ध आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांचे कामाच्या घाईचे दिवस आहेत. 'या सर्व परिस्थितीत, संस्थेच्या वास्तूंचे नुकसान भरून काढणे आह्वानात्मक आहे', असेही ते म्हणाले.

गेल्या ३८ वर्षांपासून परिसरातील ४६ गावांसाठी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि समग्र ग्रामविकास अशा पंचसूत्रीवर संस्थेचे काम सुरू आहे. डॉ. राजा दांडेकर आणि शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या दूरदृष्टीच्या व अथक मेहनतीच्या बळावर संस्थेने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची पहाट आणली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने, कौशल्ये शिकवून गावात उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यापलिकडे जाऊन सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्नही आजवर संस्था करत आली आहे. कोरोना संकटकाळात जवळपास ४३ खेड्यांमध्ये सुरू असलेला संस्थेचा 'अन्नदान प्रकल्प' हे त्याचेच एक उदाहरण आहे. हेच सामाजिक भान जपत, शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटातही संस्थेसाठी श्रमदान करायला पुढे येण्याची तयारी दाखवली आहे.स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला या क्षणी, आर्थिक सहकार्याची गरज आहे. संस्थेला पाठवलेल्या देणगीचा प्रत्येक रुपया चोख हिशेबासह त्या-त्या कामासाठीच वापरला जाण्याचा संस्थेचा लौकिक आहे. www.loksadhana.org या संकेतस्थळाच्या मदतीने आपण संस्थेपर्यंत पोहोचून आपले योगदान देऊ शकता.आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक वादळे पेललेल्या लोकसाधना परिवारानं याही वादळावर मात करून उभे राहण्याचा चंग बांधला आहे. आणि त्यासाठी समाजाची साथ लाभेल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ