शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 17:38 IST

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज

अरबी समुद्रात तयार झालेल्या 'निसर्ग'  चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातल्या अनेक गावांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये, मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी 'लोकसाधना' ही सामाजिक संस्थाही त्याला अपवाद नाही. संस्थेच्या महाविद्यालयाच्या 'लोकनिर्माण भवन' या इमारतीची या वादळात वाताहत झाली आहे.३० किलो वजनाचे चिरे भिंतीतून सुटून दूरवर जाऊन पडले, इतका वाऱ्याचा जोर जबरदस्त होता", अशी माहिती संस्थेचे विश्वस्त ऍड. कैवल्य दांडेकर यांनी दिली आहे. त्याखेरीज ग्रंथालय, आमराई तसेच संस्थेने गावासाठी उभारलेल्या बसथांब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपासच्या अनेक गावांमध्ये घरांचे व झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे मनुष्यबळ कमी उपलब्ध आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांचे कामाच्या घाईचे दिवस आहेत. 'या सर्व परिस्थितीत, संस्थेच्या वास्तूंचे नुकसान भरून काढणे आह्वानात्मक आहे', असेही ते म्हणाले.

गेल्या ३८ वर्षांपासून परिसरातील ४६ गावांसाठी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि समग्र ग्रामविकास अशा पंचसूत्रीवर संस्थेचे काम सुरू आहे. डॉ. राजा दांडेकर आणि शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या दूरदृष्टीच्या व अथक मेहनतीच्या बळावर संस्थेने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची पहाट आणली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने, कौशल्ये शिकवून गावात उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यापलिकडे जाऊन सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्नही आजवर संस्था करत आली आहे. कोरोना संकटकाळात जवळपास ४३ खेड्यांमध्ये सुरू असलेला संस्थेचा 'अन्नदान प्रकल्प' हे त्याचेच एक उदाहरण आहे. हेच सामाजिक भान जपत, शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटातही संस्थेसाठी श्रमदान करायला पुढे येण्याची तयारी दाखवली आहे.स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला या क्षणी, आर्थिक सहकार्याची गरज आहे. संस्थेला पाठवलेल्या देणगीचा प्रत्येक रुपया चोख हिशेबासह त्या-त्या कामासाठीच वापरला जाण्याचा संस्थेचा लौकिक आहे. www.loksadhana.org या संकेतस्थळाच्या मदतीने आपण संस्थेपर्यंत पोहोचून आपले योगदान देऊ शकता.आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक वादळे पेललेल्या लोकसाधना परिवारानं याही वादळावर मात करून उभे राहण्याचा चंग बांधला आहे. आणि त्यासाठी समाजाची साथ लाभेल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ