शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

लॉकडाऊन, तरीही धोकादायक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार करता, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. मात्र, लॉकडाऊन करुनही परिस्थिती धोकादायक झाली असेल तर अजून प्रशासनाने काय-काय करायला पाहिजे, असे विचार मनात येतात. शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कडक उन्हामध्ये काम करत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा असते. मात्र, बाजारपेठेत काही दुकानदारांनी त्यालाही हरताळ फासला होता. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असताना बाजारपेठेतील काही दुकानदारांनी केवळ दाखवायला शटर बंद करुन ग्राहकांना सेवा पुरवत होते. शटर उघडून दोन-चार ग्राहकांना सेवा देऊन ते बाहेर गेल्यावर पुन्हा खरेदीसाठी आणखी दोन-चार ग्राहकांना आतमध्ये घेत होत. हे काही दिवस सुरु होते. दरम्यान, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा सुरु असतानाच इतर व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या फायद्यासाठी प्रशासनाला वेठीस धरुन व्यवसाय सुरु ठेवणे, हे कितपत योग्य आहे.

लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, सर्व प्रकारची आंदोलने, माेर्चे यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातले आणि ग्रामीण भागातील सर्वच आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. शहर परिसरातील सर्व तलाव, स्वीमिंग पूल, क्रीडा व इतर स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम यांच्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना काही भागामध्ये फळ-भाजी विक्रेते फिरताना दिसत आहेत. तेही इतर व्यवसायांप्रमाणे बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, ही बाब खेदजनक आहे.

कोरोना झपाट्याने वाढत असतानाच एकीकडे प्रशासन तळमळीने काम करत असतानाच त्याला लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचे काही ठिकाणचे चित्र पाहिल्यास लक्षात येते. पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी बंद असल्यागत वातावरण दिसते. इतर ठिकाणी पाहिल्यास त्याच्या विरुध्द चित्र पाहायला मिळते. त्यामुळे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा ते मनमानीपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत घट होण्यापेक्षा लक्षणीय वाढ होत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येते. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात पाहिले तर कोरोनाबाधित रुग्णांसह बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येकाने कोरोनाचा बळी ठरण्यास तयार व्हावे, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी या महामारीच्या दिवसात प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे संकट अत्यंत धोकादायक ठरणार आहे, याची प्रत्येकाने नोंद घेणे आवश्यक आहे.