शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

लॉकडाऊन, तरीही धोकादायक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार करता, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. मात्र, लॉकडाऊन करुनही परिस्थिती धोकादायक झाली असेल तर अजून प्रशासनाने काय-काय करायला पाहिजे, असे विचार मनात येतात. शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कडक उन्हामध्ये काम करत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा असते. मात्र, बाजारपेठेत काही दुकानदारांनी त्यालाही हरताळ फासला होता. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असताना बाजारपेठेतील काही दुकानदारांनी केवळ दाखवायला शटर बंद करुन ग्राहकांना सेवा पुरवत होते. शटर उघडून दोन-चार ग्राहकांना सेवा देऊन ते बाहेर गेल्यावर पुन्हा खरेदीसाठी आणखी दोन-चार ग्राहकांना आतमध्ये घेत होत. हे काही दिवस सुरु होते. दरम्यान, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा सुरु असतानाच इतर व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या फायद्यासाठी प्रशासनाला वेठीस धरुन व्यवसाय सुरु ठेवणे, हे कितपत योग्य आहे.

लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, सर्व प्रकारची आंदोलने, माेर्चे यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातले आणि ग्रामीण भागातील सर्वच आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. शहर परिसरातील सर्व तलाव, स्वीमिंग पूल, क्रीडा व इतर स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम यांच्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना काही भागामध्ये फळ-भाजी विक्रेते फिरताना दिसत आहेत. तेही इतर व्यवसायांप्रमाणे बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, ही बाब खेदजनक आहे.

कोरोना झपाट्याने वाढत असतानाच एकीकडे प्रशासन तळमळीने काम करत असतानाच त्याला लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचे काही ठिकाणचे चित्र पाहिल्यास लक्षात येते. पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी बंद असल्यागत वातावरण दिसते. इतर ठिकाणी पाहिल्यास त्याच्या विरुध्द चित्र पाहायला मिळते. त्यामुळे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा ते मनमानीपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत घट होण्यापेक्षा लक्षणीय वाढ होत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येते. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात पाहिले तर कोरोनाबाधित रुग्णांसह बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येकाने कोरोनाचा बळी ठरण्यास तयार व्हावे, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी या महामारीच्या दिवसात प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे संकट अत्यंत धोकादायक ठरणार आहे, याची प्रत्येकाने नोंद घेणे आवश्यक आहे.