शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
2
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
3
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
4
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
5
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
6
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
7
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
8
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
9
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
10
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
11
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
12
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
13
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
14
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
15
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
16
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
17
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
18
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
19
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
20
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, तरीही धोकादायक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालल्याने लॉकडाऊन करुनही वातावरण धोकादायक बनेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात विचार करता, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. मात्र, लॉकडाऊन करुनही परिस्थिती धोकादायक झाली असेल तर अजून प्रशासनाने काय-काय करायला पाहिजे, असे विचार मनात येतात. शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कडक उन्हामध्ये काम करत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा असते. मात्र, बाजारपेठेत काही दुकानदारांनी त्यालाही हरताळ फासला होता. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद असताना बाजारपेठेतील काही दुकानदारांनी केवळ दाखवायला शटर बंद करुन ग्राहकांना सेवा पुरवत होते. शटर उघडून दोन-चार ग्राहकांना सेवा देऊन ते बाहेर गेल्यावर पुन्हा खरेदीसाठी आणखी दोन-चार ग्राहकांना आतमध्ये घेत होत. हे काही दिवस सुरु होते. दरम्यान, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा सुरु असतानाच इतर व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या फायद्यासाठी प्रशासनाला वेठीस धरुन व्यवसाय सुरु ठेवणे, हे कितपत योग्य आहे.

लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, सर्व प्रकारची आंदोलने, माेर्चे यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातले आणि ग्रामीण भागातील सर्वच आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. शहर परिसरातील सर्व तलाव, स्वीमिंग पूल, क्रीडा व इतर स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम यांच्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना काही भागामध्ये फळ-भाजी विक्रेते फिरताना दिसत आहेत. तेही इतर व्यवसायांप्रमाणे बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, ही बाब खेदजनक आहे.

कोरोना झपाट्याने वाढत असतानाच एकीकडे प्रशासन तळमळीने काम करत असतानाच त्याला लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचे काही ठिकाणचे चित्र पाहिल्यास लक्षात येते. पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी बंद असल्यागत वातावरण दिसते. इतर ठिकाणी पाहिल्यास त्याच्या विरुध्द चित्र पाहायला मिळते. त्यामुळे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा ते मनमानीपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत घट होण्यापेक्षा लक्षणीय वाढ होत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येते. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात पाहिले तर कोरोनाबाधित रुग्णांसह बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येकाने कोरोनाचा बळी ठरण्यास तयार व्हावे, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी या महामारीच्या दिवसात प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे संकट अत्यंत धोकादायक ठरणार आहे, याची प्रत्येकाने नोंद घेणे आवश्यक आहे.