शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

थोडी राजकीय हलचल -

By admin | Updated: June 17, 2016 23:34 IST

कोकण किनारा... रत्नागिरी

दोन कदमांमधील संघर्ष आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पुन्हा एकदा बसलेला धक्का! यामुळे जिल्ह्यात थोडी का होर्ईना राजकीय हलचल निर्माण झाली आहे. आणखी सहा महिन्यांनी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यानंतर दोन महिन्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या. पण तरीही रत्नागिरी जिल्हा मात्र राजकीयदृष्ट्या निद्रिस्तच आहे. त्यात आता आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय क्षेत्राला थोडी जाग आली आहे. ही जाग आगामी दोन निवडणुकांपर्यंत टिकेल, अशी आशा आहे. कारण तसं झालं तरच लोकांसाठी काहीतरी करायची स्पर्धा लागेल.रोज काही ना काही घडामोडी घडताहेत, असे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात कधीच दिसत नाही. त्यात राजकीय क्षेत्र तर पूर्णपणेच शांत आहे. एकमेकांवर कुरघोड्या, आरोप - प्रत्यारोप केले जात नाहीत, ही बाब उत्तम. पण अशा टीकेखेरीज प्रगतीही होत नाही. कोणीतरी चुका दाखवल्याशिवाय सुधारणाही होत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण सतत जागे असल्यानेच तिथे विकासाच्या नव्यानव्या गोष्टी घडतात. स्वत:ला सत्तेत किंबहुना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राजकीय लोक सातत्याने काही ना काही उपक्रम राबवतच असतात. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र या साऱ्याची वानवा आहे. दुसरा पुढे जाईल म्हणून तरी आपण काहीतरी करायला हवे, अशी मानसिकता इथल्या राजकीय लोकांमध्ये दिसत नाही. या नकारात्मकतेमुळेच रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात नवीन प्रकल्प आलेला नाही, उद्योग उभे राहिलेले नाहीत किंवा रोजगार निर्माण करतील, अशा कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत.गेले काही दिवस राजकीय क्षेत्रात मात्र थोडी हलचल सुरू झाली आहे. ही हलचल सध्या तरी त्या-त्या पक्षांपुरती किंवा राजकीय क्षेत्रापुरती मर्यादीत आहे. त्याचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर कोणताच परिणाम होणार नाही. पण निद्रिस्त किंबहुना निपचित पडलेल्या रत्नागिरीतील राजकारणात ही हलचल दिसली, हेही नसे थोडके.सध्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि एकेकाळी त्यांचेच चेले म्हणून प्रसिद्ध असलेले व सध्या स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केलेले दापोली - गुहागर - खेडचे आमदार संजय कदम यांच्यामध्ये शाब्दिक वादवादी जोरदार रंगली. आपण आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वादामुळे दापोली मतदारसंघ संजय कदम यांच्याकडे गेला, अशी कबुली देतानाच रामदास कदम यांनी संजय कदम यांना पराभूत करण्याची गर्जना केली. त्याला संजय कदम यांनी उत्तर दिले. त्यावर परत रामदास कदम आणि परत संजय कदम असे आरोप-प्रत्यारोप होत राहिले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहात आले आहेत. आता नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत या उत्साहाची झलक पाहायला मिळेल. रत्नागिरी शहराला लागूनच असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणजे नाचणे. येथे उपसरपंच पदासाठी पक्षाने आमदार उदय सामंत यांच्यासमवेत शिवसेनेत दाखल झालेले भय्या भोंगले यांची निवड केली होती. प्रत्यक्षात शिवसेना सदस्यांनी कपील सुपल यांना निवडून दिले. या जागेवर भोंगले यांना बसवण्यासाठी पक्षाकडून सुपल यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार सुपल यांनी राजीनामा दिला. मात्र, परत झालेल्या निवडणुकीत शिवसेना सदस्यांनी सुपल यांचीच निवड केली. या प्रकारामुळे शिवसेनेत हलचल उडाली आहे. आमदार सामंतसमर्थक भोंगले यांना डावलण्यात आल्याची वृत्ते सर्वत्र झळकली. त्यावर सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘समर्थक’ या शब्दावर आक्षेप घेतला. शिवसेनेत कोणी समर्थक नाहीत, सर्व शिवसैनिक आहेत, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण राजकारणात असे होत नाही. एखाद्या नेत्याच्या पक्षांतरात जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत पक्षांतर करतात, त्यांना समर्थक अशीच ओळख मिळते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाला ११ वर्षे झाली. त्यांच्यासोबतचे काहीजण परतही गेले. पण, त्यांची राणेसमर्थक ही ओळख अजून कायम आहे.सद्यस्थितीत या दोन घटनांनी राजकारणात चर्चेचे विषय झाले आहेत. आता नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, हे नक्की.