शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

कमळ हसले; धनुष्यबाण हिरमुसला

By admin | Updated: May 19, 2016 23:55 IST

रत्नागिरी नगरपरिषद : नगराध्यक्षांनी केले सभागृह ‘सील’, पाणी योजनेच्या सादरीकरणाचा बार फुसका

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहातच वाढीव पाणीपुरवठा योजनेचे ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ घेण्याचा शिवसेनेचा बार आज गुरुवारी फुसका ठरला. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पालिका सभागृह चक्क ‘सील’ केल्याने सेनेची कोंडी झाली. परिणामी तलवार म्यान करण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. या योजनेचे ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ न होता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नुसतेच सादरीकरण झाले. त्यामुळे पालिकेत ‘कमळ खुलले, धनुष्यबाण हिरमुसला’ अशी चर्चा सुरू होती. गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवरून नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व आमदार उदय सामंत तसेच सेना नगरसेवक यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. शासन व जिल्हा नियोजन मंडळाने रत्नागिरी शहराला दिलेला निधी योग्यप्रकारे खर्ची पडला की नाही, याची माहिती घेण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी नगरपरिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव नगरपरिषदेने सादर केल्याची माहिती त्यांना मिळाली. ही योजना लवकरात लवकर व्हावी, यासाठी पालिकेला आपणही सहकार्य करू, अशी भूमिका आमदार सामंत यांनी घेतली. त्यासाठी जीवन प्राधिकरणकडून सर्वांसाठी माहिती व्हावी म्हणून १९ मे रोजी पालिकेच्या सभागृहात योजनेचे सादरीकरण करण्याचा निर्णय सामंत यांनी घेतला. मात्र, आमदार सामंत हे या प्रकरणात श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी प्रसारमाध्यमांकडे केला होता.या विषयाबाबत सातत्याने आरोप - प्रत्यारोप सुरू होते. त्यातूनच नगरपरिषदेच्या सभागृहात हे सादरीकरण करता येणार नाही, असे पालिकेने सामंत यांना कळविले. त्यावरून सभागृहातच हे सादरीकरण करणार, असे सेना नगरसेवकांनी नगराध्यक्षांना ठणकावले. त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी उपस्थित राहणार असल्याचेही जाहीर झाले. त्यामुळे १९ मे रोजी पालिकेत राजकीय राडा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.आज गुरुवारी पालिकेच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी १०.३० वाजता सेनेचे खासदार राऊत, आमदार सामंत, साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, पक्षप्रतोद बंड्या साळवी यांच्यासह सेनेचे नगरसेवक, जीवन प्राधिकरणचे अधिकारी मुल्ला हे पालिकेत आले. संत गाडगेबाबा सभागृह आधीच सीलबंद केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे खासदार राऊत यांनी संयमी भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सादरीकरण करण्यास सांगितले.शहरात झालेल्या ‘वॉटर आॅडिट’नुसार २९८ नळजोडण्या अनधिकृत असल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. तसेच वितरण व्यवस्थेत ४२ टक्के गळतीचे प्रमाण आहे. २१ दशलक्ष लीटर पाण्याची योजना आहे. वितरण व्यवस्था बदलण्यासाठी ८ कोटींचा खर्च येणार आहे. पूर्ण योजना ही ६८.४० कोटींची आहे. यावर सर्व त्रुटी दूर करूनच हा प्रस्ताव राज्याच्या सुकाणू समितीकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. तासाभराच्या चर्चेनंतर प्रेझेंटेशन संपले. (प्रतिनिधी)शांततेत सादरीकरण : ...तर दरोड्याचा गुन्हाशिवसेनेच्या राजकीय खेळीला मात देण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर गटाकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यानुसार पालिका सभागृह नुसतीच कडी लावून ठेवावे, असे प्रथम ठरले होते. नंतर मात्र सभागृह ‘सील’ केले गेले. सील तोडून प्रवेश केला गेला असता तर तो दरोड्याचा गुन्हा ठरला असता. मात्र, खासदार राऊत यांनी संभाव्य घटनांचा अंदाज घेत सभागृहापासून दूर जाणेच पसंत केले. त्यामुळेच पालिकेत हे सादरीकरण शांततेत झाले.निवडणुका होण्याआधी योजना अशक्यचअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून वाढीव पाणी योजनेच्या तांत्रिक मंजुरीलाच दोन ते तीन महिने जातील. प्रस्ताव सादरीकरणानंतर त्रुटी दूर करून सुकाणू समिती मंजुरी देईपर्यंत आणखी महिने जातील. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही योजना पूर्णत्त्वास जाऊ शकत नाही, हेसुध्दा स्पष्ट झाले.