शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

निकृष्ट काम : तीन महिन्याच्या आत दिवे बंद

पाचल : सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, यासाठी शासन अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेद्वारे पाचल (ता. राजापूर) गावात सौरदिवे बसवण्यात आले. मात्र, हे सौरदिवे इतके निकृष्ट होते की, दिवे बसवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आतच ते बंद पडले आहेत. गावात प्रकाश पडावा, यासाठी रात्रीच्या वेळी भीती व धोका वाटू नये, म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मोक्याच्या जागी हे सौरदिवे बसवण्याऐवजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या हुकमी मतदारसंघात बसवले आहेत. दिवे बसवल्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आपल्यासाठी बरेच काही तरी करत आहेत, असे सुरुवातीला मतदारांनासुद्धा वाटू लागले. परंतु हळूहळू सत्य बाहेर येऊ लागल्याने ग्रामस्थांचा संताप वाढू लागल्याचे सर्वत्र चित्र मिळत आहे. ग्रामपंचायतीने दिवे खेरदी करताना खात्रीलायक पुरवठा करणाऱ्या कंपनीला टेंडर द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. निकृष्ट दिवे खरेदी करण्यात आले. टेंडर मंजूर करताना अर्थकरण दडल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या रकमेची खरेदी दाखवून निम्म्या भागात खरेदी करण्यात आली. त्यामुळे या सौरदीप मालिकेतील बॅटरी हलक्या स्वरुपाची, तर सौरउष्णता खेचून घेणारी प्लेट एकदम निकृष्ट असल्याने हे सौरदिवे लवकर खराब झाले आहेत. पाणलोट विकास कार्यक्रमातून खरेदी करण्यात आलेल्या सौरदिवे खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक दिवे १५ दिवसांच्या आत बंद पडले आहेत. खरेदी खरेतर कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव, सदस्य यांना मार्गदर्शन करणारे कृषी खात्याचे कर्मचारीसुद्धा या बोगस खरेदीत समाविष्ट झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी कधीही चुकीच्या कामांना अथवा चुकीचे काम करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट चुकीचे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे एका चुकीच्या निर्णयाला समर्थन मिळाल्याने सौर दिव्यासारखी मौल्यवान योजना अखेरची घटका मोजत आहे. एका बाजूस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तर दुसरी बाजूला पाणलोट अध्यक्ष, कमिटी व अधिकारी अशा दोन्ही बाजू भ्रष्टाचारात सहभागी आहेत. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)