शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

निकृष्ट काम : तीन महिन्याच्या आत दिवे बंद

पाचल : सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, यासाठी शासन अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेद्वारे पाचल (ता. राजापूर) गावात सौरदिवे बसवण्यात आले. मात्र, हे सौरदिवे इतके निकृष्ट होते की, दिवे बसवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आतच ते बंद पडले आहेत. गावात प्रकाश पडावा, यासाठी रात्रीच्या वेळी भीती व धोका वाटू नये, म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मोक्याच्या जागी हे सौरदिवे बसवण्याऐवजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या हुकमी मतदारसंघात बसवले आहेत. दिवे बसवल्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आपल्यासाठी बरेच काही तरी करत आहेत, असे सुरुवातीला मतदारांनासुद्धा वाटू लागले. परंतु हळूहळू सत्य बाहेर येऊ लागल्याने ग्रामस्थांचा संताप वाढू लागल्याचे सर्वत्र चित्र मिळत आहे. ग्रामपंचायतीने दिवे खेरदी करताना खात्रीलायक पुरवठा करणाऱ्या कंपनीला टेंडर द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. निकृष्ट दिवे खरेदी करण्यात आले. टेंडर मंजूर करताना अर्थकरण दडल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या रकमेची खरेदी दाखवून निम्म्या भागात खरेदी करण्यात आली. त्यामुळे या सौरदीप मालिकेतील बॅटरी हलक्या स्वरुपाची, तर सौरउष्णता खेचून घेणारी प्लेट एकदम निकृष्ट असल्याने हे सौरदिवे लवकर खराब झाले आहेत. पाणलोट विकास कार्यक्रमातून खरेदी करण्यात आलेल्या सौरदिवे खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक दिवे १५ दिवसांच्या आत बंद पडले आहेत. खरेदी खरेतर कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव, सदस्य यांना मार्गदर्शन करणारे कृषी खात्याचे कर्मचारीसुद्धा या बोगस खरेदीत समाविष्ट झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी कधीही चुकीच्या कामांना अथवा चुकीचे काम करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट चुकीचे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे एका चुकीच्या निर्णयाला समर्थन मिळाल्याने सौर दिव्यासारखी मौल्यवान योजना अखेरची घटका मोजत आहे. एका बाजूस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तर दुसरी बाजूला पाणलोट अध्यक्ष, कमिटी व अधिकारी अशा दोन्ही बाजू भ्रष्टाचारात सहभागी आहेत. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)