शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या ...

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या जातीच्या भातासाठी पाऊस चांगला आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात आले आहे. पैकी ४० टक्के हळव्या जातीचे, ४० टक्के निमगरवे तर २० टक्के गरव्या जातीच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. पैकी हळव्या जातीचे भात काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आले आहे.

त्याचबराेबर पसवलेल्या भाताने लोंब्या टाकल्या असून त्या दुधावस्थेत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे फुलोरा झडून जाण्याची शक्यता आहे. पसवलेल्या भातामध्ये दाणा तयार झालेला नाही. अति पावसामुळे दाणा काळपट पडून पोचट होणार आहे. सलग दोन आठवडे कडाक्याच्या उन्हामुळे कोरड्या झालेल्या भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. कडक उन्हामुळे वाळत आलेल्या पिकाला त्यामुळे जीवदान मिळाले आहे.

वास्तविक, यावर्षी लवकर झालेल्या पावसामुळे भातलागवड वेळेवर पूर्ण झाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. कडक उन्हामुळे काही ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. निळे फुंगेरे, काटेरी भंगेरे तसेच पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करून कीडरोग आटोक्यात आणला आहे.

मुसळधार पावसामुळे हळव्या भातपिकावर परिणाम झाला आहे. पावसाचे प्रमाण सतत राहिले तर मात्र हळवे भातपीक धोक्यात येईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.