शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या ...

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या जातीच्या भातासाठी पाऊस चांगला आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात आले आहे. पैकी ४० टक्के हळव्या जातीचे, ४० टक्के निमगरवे तर २० टक्के गरव्या जातीच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. पैकी हळव्या जातीचे भात काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आले आहे.

त्याचबराेबर पसवलेल्या भाताने लोंब्या टाकल्या असून त्या दुधावस्थेत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे फुलोरा झडून जाण्याची शक्यता आहे. पसवलेल्या भातामध्ये दाणा तयार झालेला नाही. अति पावसामुळे दाणा काळपट पडून पोचट होणार आहे. सलग दोन आठवडे कडाक्याच्या उन्हामुळे कोरड्या झालेल्या भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. कडक उन्हामुळे वाळत आलेल्या पिकाला त्यामुळे जीवदान मिळाले आहे.

वास्तविक, यावर्षी लवकर झालेल्या पावसामुळे भातलागवड वेळेवर पूर्ण झाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. कडक उन्हामुळे काही ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. निळे फुंगेरे, काटेरी भंगेरे तसेच पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करून कीडरोग आटोक्यात आणला आहे.

मुसळधार पावसामुळे हळव्या भातपिकावर परिणाम झाला आहे. पावसाचे प्रमाण सतत राहिले तर मात्र हळवे भातपीक धोक्यात येईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.