शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रमाणपत्रांसाठी ‘अपंगां’च्या उड्या

By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST

महाराष्ट्र राज्य : अपंग योजनांच्या लाभधारकांमध्ये वाढ

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी अपंगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेकडो लोक पुढे येत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ जिल्ह्यात १ लाख १४ हजार ८ जणांना पाच प्रकारच्या अपंगत्वाची प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. यातील अपंगत्व प्रमाणपत्र घेणार्‍यांची सर्वाधिक संख्या १५,६८२ ही पुणे जिल्ह्यात असून, अमरावती दुसर्‍या, तर जळगाव तिसर्‍या क्रमांकावर आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे ७,२५८ व ६,७५८ जणांना ही प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. पूर्वी अपंगांमध्ये असलेली निरक्षरता आणि उदासिनता आता कमी झाली आहे. अपंग त्यांच्या हक्काबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे आपण अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळवणे किती महत्त्वाचे असते, हे त्यांना पटू लागले असून त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अपंग बांधवांची धडपड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येते. रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या अपंगत्व आलेल्या वृध्दांकडून या प्रमाणपत्रांची मागणी वाढली आहे. पूर्णत: अंध, पूर्णत: कर्णबधीर, पूर्णत: शारीरिक अपंगता, पूर्ण मतिमंद, पूर्ण मानसिक आजार अशा पाच प्रकारांमध्ये ही अपंगत्वाची प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालय व संबंधित रुग्णालयातून देण्यात आली आहेत. शासनाने अपंग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत. काही काळापासून या योजना अस्तित्त्वात आहेत. मात्र, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या योजनांची माहिती याआधी पोहोचत नव्हती. गेल्या वर्षभराच्या काळात विविध सामाजिक संस्थांनी याबाबतची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे आता जन्मत: व अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्ती अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेत आहेत. या प्रमाणपत्रासाठी अर्ज करीत आहेत. राज्य व केंद्रातर्फे अपंगांकरिता विविध कल्याणकारी योजना सध्या राबविल्या जात आहेत. शालांत पूर्व शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, लघुउद्योगांकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय, पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय, शालांत परीक्षेनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व उद्योगाचे प्रशिक्षण, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे, व्यावसायिक प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे. घरघंटी योजना, अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, वृध्द अपंगांना निवृत्ती वेतन देणे यांसारख्या विविध योजना शासन राबवित आहेत. गेल्या वर्षभरात पूर्ण अंधत्वासाठी सर्वाधिक २५०४ प्रमाणपत्र अमरावती जिल्ह्यातून दिली गेली आहेत. पुणेत २०५४ व वाशिममध्ये १३३९ जणांना प्रमाणपत्र दिली गेल्याने हे जिल्हे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत. कर्णबधिरांसाठी पुणेत २५४४, पूर्ण अपंगत्वासाठी नाशिकमध्ये ८८३१, मतिमंदांसाठी यवतमाळध्ये सर्वाधिक १३१, तर पूर्ण मानसिक आजारासाठी मुंबईत २१८३ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.