शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित

By मेहरून नाकाडे | Updated: June 3, 2023 16:40 IST

रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे. भरारी पथकाव्दारे . जिल्हयातील परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणी करताना चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. शिवाय ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

खरीप हंगामात जिल्हयामध्ये भात व नागली ही प्रमुख दोन पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात पिक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व किटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हयात दहा भरारीपथक स्थापन केले असून २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत, या निरिक्षकांतर्फे जिल्हयातील परवानाधारक कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अदयावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, परवाना काढलेला आहेत परंतु कोणताही व्यवसाय केला जात नसल्याचे तपासणी दरम्यान आढळले. त्यामुळे चार परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १, राजापुर १, चिपळुण तालुक्यातील २ परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तसेच ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व किटक नाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करुन तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दयावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्राची तपासणी व परवाना निलंबनाची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली आहे.