शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित

By मेहरून नाकाडे | Updated: June 3, 2023 16:40 IST

रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे. भरारी पथकाव्दारे . जिल्हयातील परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणी करताना चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. शिवाय ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

खरीप हंगामात जिल्हयामध्ये भात व नागली ही प्रमुख दोन पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात पिक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व किटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हयात दहा भरारीपथक स्थापन केले असून २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत, या निरिक्षकांतर्फे जिल्हयातील परवानाधारक कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अदयावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, परवाना काढलेला आहेत परंतु कोणताही व्यवसाय केला जात नसल्याचे तपासणी दरम्यान आढळले. त्यामुळे चार परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १, राजापुर १, चिपळुण तालुक्यातील २ परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तसेच ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व किटक नाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करुन तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दयावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्राची तपासणी व परवाना निलंबनाची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली आहे.