शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित

By मेहरून नाकाडे | Updated: June 3, 2023 16:40 IST

रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे. भरारी पथकाव्दारे . जिल्हयातील परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणी करताना चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. शिवाय ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

खरीप हंगामात जिल्हयामध्ये भात व नागली ही प्रमुख दोन पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात पिक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व किटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हयात दहा भरारीपथक स्थापन केले असून २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत, या निरिक्षकांतर्फे जिल्हयातील परवानाधारक कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अदयावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, परवाना काढलेला आहेत परंतु कोणताही व्यवसाय केला जात नसल्याचे तपासणी दरम्यान आढळले. त्यामुळे चार परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १, राजापुर १, चिपळुण तालुक्यातील २ परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तसेच ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व किटक नाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करुन तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दयावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्राची तपासणी व परवाना निलंबनाची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली आहे.