शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

कोकणचं कोकणपण जपूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग नव्हे तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला भाग म्हणजे कोकण ...

कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग नव्हे तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला भाग म्हणजे कोकण ! आणि कोकणात पाऊस नाही तर काय असणार? अहो ! आपल्या कोकणातला प्रत्येक माणूस अगदी अभिमानाने म्हणतो, ‘मी अमुक अमुक पावसाळे बघितलेत ! अहो आजपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेलेले बघितले.’

गुजरातपासून अगदी कारवारपर्यंतचा भाग म्हणजे कोकण! ज्या कोकण प्रांताला एका बाजूला सुमारे १,६०० किलाेमीटरचा पश्चिम घाट लाभला आहे आणि पायथ्याशी अरबी समुद्राची गाज आहे. एकूण चार राज्यांंमध्ये (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ) कोकण प्रांत वसलेला आहे. याच भूमीला अपरांत भूमी किंवा परशुराम भूमी म्हणून ओळखले जाते.

आज पावसाने सगळ्या कोकणात हाहाकार माजवलेला असताना, सगळीकडे पुराचे पाणी, दरडी कोसळत असताना मदतीसाठी हात पुढे येत आहेत. कोकणी माणूस कधीच मागे राहत नाही, तो आखडता हातही घेत नाही. या कोकणी माणसाने दुसऱ्या क्षणापासून मदतीच्या ओघाला सुरुवातही केली आहे.

पण याच कोकणी माणसाला आता काही पर्यावरणवादी धडे द्यायला पुढे सरसावलेले दिसत आहेत. मंडळी मी पर्यावरणवादाच्या विरोधात नाही की विकासवादाचा मारेकरीही नाही. पण हे असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस आपण निसर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहोत. अहो, या सगळ्यावरुन राजकारण हे होतच राहणार, राजकारणी निसर्गावर खापर फोडून मोकळे होणार, मोठमोठ्या घोषणा होणार, पुनर्वसन, स्थलांतर, ह्यांव नी त्यांव!

निसर्गाची कमीतकमी हानी करुन कोकणचा विकास झाला तर भविष्यात अशा घटना कोकणात घडणार नाहीत. मला आठवतं आमचं बालपण ! अहो, आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा कधी-कधी १५ / १५ दिवस आम्ही सूर्य पाहायचो नाही, इतका पाऊस असायचा. नद्या-नाले तुडुंब भरुन वाहायचे, मग का कधी असं कुठे पुराचं पाणी येत नव्हतं कुणाच्या संसारात का कधी डोंगर वाड्या-वस्त्यांवर येऊन सगळं उद्ध्वस्त करत होते, नाही ना? आम्ही शाळेतून येताना आम्हाला मध्ये एक वहाळ लागायचा, पावसाळ्यात बऱ्याचदा भरुन वाहायचा, नाही त्याने कधी कुणाचा जीव घेतला. थोडावेळ थांबायचो आम्ही, पाणी उतरायचं नाहीतर कोणी तरी यायचं आणि आम्हाला खांद्यावर उचलून घेऊन वहाळ पार करुन द्यायचं. ना कुठल्या वहाळावर की नदीवर पूल होते. तेव्हाही विकास या कोकणात हळूहळू येत होता. सगळं सावरत सावकाशीने येत होता !

आम्ही लहान असतानाच आमच्या गावात वीज आली पण त्या विजेने नाही बळी घेतले मोठमोठ्या वृक्षांचे की नाही जेसीबीने डोंगर पोखरले, आमचे आजी आजोबा, आई - बाबा या विकासाचे मनापासून स्वागत करत होते. पण निसर्गाप्रति असणारे आपले कर्त्यव्य मात्र कधीच विसरत नव्हते. त्यानी जंगले तोडून कधी बागायती करण्याचा हट्ट नाही धरला. उलट बागायती करताना इतर जंगली झाडांनाही जगू दिलं, जगवलं !

कोकणच्या या ऱ्हासाला इथे येणारे विकासाचे प्रकल्प कारणीभूत नाहीत तर आपण कोकणवासीच कारणीभूत आहोत. होय, होय ! आपणचं कारणीभूत आहोत आणि आपणचं आपली पोटं भरण्यासाठी उभ्या केलेल्या एनजीओ कारणीभूत आहेत. जगाबरोबर कोकणचाही विकास झाला पाहिजे पण इथल्या माणसाने निसर्गाचे अस्तित्व मान्य करायला हवे. इथेच एखादी नोकरी करण्यासाठी एखादा प्रकल्पही आमच्या कोकणात यायला हवा पण आमचा निसर्ग आम्हीच शाबूत ठेवला पाहिजे. अहो, गेल्या अनेक दशकांपासून कोकणात कुऱ्हाडबंदी कायम आहे. पण ती फक्त कागदावर! कोकणात एखादा प्रकल्प येत असेल ना तर जसं त्याच्याविरोधात उभे राहण्यासाठी एनजीओ बनून कोसो दूर येता ना तसंच आता माझा कोकण वाचवण्यासाठी या. वाड्या-वस्त्यांवर, पाड्यापाड्यांवर जाऊन जंगलं वाढवुया, नद्या वाचवुया ! बागायतीच्या नावावर पोखरले जाणारे डोंगर, उभे सरळ कापले जाणारे डोंगर वाचवुया. नाहीतर हेच डोंगर उद्या आपल्या वाड्या-वस्त्यांवर येतील. हो ! चला कोकणचा विकास करुया पण कोकणचं कोकणपण जपत !

- विनोद पवार, राजापूर