शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

खेळाडूंना मदत करू

By admin | Updated: February 26, 2017 00:13 IST

रवींद्र वायकर : म्हाडा कला - क्रीडा महोत्सव तरंग २०१७

दापोली : या क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी शासनामार्फत आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोली येथे दिली. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही वायकर यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांनी आयोजित केलेल्या ‘म्हाडा कला व क्रीडा महोत्सव तरंग २०१७’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सचिव बी. एन. बास्टेवाड, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, दापोलीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव उपस्थित होते. कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. कोकणात समुद्रकिनारे, किल्ले तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन वृध्दीसाठी शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे वायकर यांनी सांगितले. दापोलीतील नवानगर झोपडपट्टीसाठी म्हाडाच्या माध्यमातून सर्व सुखसोयींनी समृध्द असलेली घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी म्हाडा व प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचे वायकर म्हणाले. तर काँग्रेसचं नावं न घेता त्यांनी शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जे-जे मदत करतील त्यांची मदत शिवसेना घेईल, असं सांगितलं. कोण मदत किती करतयं, त्याचे राजकीय समिकरणे सुरु आहेत. मुंबईत शिवसेनाच हवी असे सर्वसामान्य मुंबईकरांना वाटत आहे, मतदारांनी सेनेला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मुंबईत सेनेचाच महापौर असेल, असे ते म्हणाले.कोकण समृद्धीस सरकार कटिबद्धचपुढील काळात कोकणचा विकास पर्यटनातून करण्यासाठी प्रयत्न करू गोव्याकडे जाणारा पर्यटक कोकणात वळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, या पूर्वीच्या सरकारने कोकण पर्यटनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोकण पर्यटन मागासले आहे. इतर प्रदेशांच्या तुलनेत कोकण प्रदेश खूपच सुंदर आहे, कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे ते टिकवणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोकण पर्यटनातून समृद्ध कोकण बनविण्यासाठी युतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.