शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय ...

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंधांचे पालन करण्यात येत आहे. लग्नसोहळ्यासाठीही प्रशासनाने अवघ्या २५ व्यक्तींनाच परवानगी दिली असून, लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळींसह वधू-वरांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कित्येक यजमानांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. दीपावलीनंतर विवाह सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

शुभमुहूर्त मोजकेच

जुलै महिन्यात चातुर्मास सुरू झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तही मोजकेच आहेत. दि. २२ रोजी सकाळी १०.४८ व दुपारी १२.०८ व १२.४५, दि. २५ रोजी सकाळी १०.३७ व ११.५६, दुपारी १२.४५, दि. २६ रोजी सकाळी ११.४४ व दुपारी १२.४५, दि. २९ रोजी सकाळी ११.४० व दुपारी १२.४५ वाजता गाैण विवाह मुहूर्त आहेत. मात्र साखरपुड्यासाठी दि.३, दि.११, दि.१३, दि.१६, दि.२२, दि.२५, दि.२६, दि.२८, दि.२९ जुलै रोजी मुहूर्त आहेत. एकूण पाच दिवसांत लग्नाचे अकराच मुहूर्त आहेत. शासकीय निर्बंध शिथिल होत नसल्याने काहींनी दीपावलीनंतर लग्नसोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

या असतील अटी

लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू व वरांकडील मिळून अवघ्या २५ जणांनाच सहभागी होण्याची परवानगी.

वधू-वरांसह, सहभागी होणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.

लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापर सक्तीचा आहे. वाद्यवृंदासाठी मनाई केली आहे.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देताना, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

n अर्ज सादर केल्यानंतर प्रशासनाकडून शासकीय निर्बंधांची माहिती देऊन त्याचे पालन करण्यासाठी सूचित केले जाते.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देत असतानाच स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सूचना करण्यात येते, विवाह सोहळा पार पडेपर्यत इन कॅमेरा लक्ष ठेवले जाते, नियमावलींचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाते.

n लग्नसोहळ्यासाठी वाद्यवृंद, लाऊडस्पिकर, डीजे, वरात काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

लग्नासाठी शासकीय अटी-शर्थीच अधिक आहेत. लग्नासाठी मोजक्या माणसांची अट असल्याने त्यासाठी सभागृहाचे भाडे भरणे परवडणारे नाही. मंदिरे बंद आहेत, शिवाय पावसाळा असल्याने दारात लग्न करणे अशक्य असल्याने दीपावलीनंतरच मुलाचे लग्न उरकण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित तोपर्यत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

- एस. आर. काळे,

वधूपिता, रत्नागिरी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. निर्बंधात कसूर झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा भोगण्यापेक्षा मुलांचे लग्न तूर्तास रद्द केले आहे. भविष्यात शिथिलता जारी केल्यानंतर विवाह सोहळा उरकण्यात येईल. शेवटी हाैस एकदाच होते, त्यामुळे नंतरच नियोजन करता येईल.

- जे. डी. पावसे,

वरपिता, रत्नागिरी