शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय ...

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंधांचे पालन करण्यात येत आहे. लग्नसोहळ्यासाठीही प्रशासनाने अवघ्या २५ व्यक्तींनाच परवानगी दिली असून, लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळींसह वधू-वरांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कित्येक यजमानांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. दीपावलीनंतर विवाह सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

शुभमुहूर्त मोजकेच

जुलै महिन्यात चातुर्मास सुरू झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तही मोजकेच आहेत. दि. २२ रोजी सकाळी १०.४८ व दुपारी १२.०८ व १२.४५, दि. २५ रोजी सकाळी १०.३७ व ११.५६, दुपारी १२.४५, दि. २६ रोजी सकाळी ११.४४ व दुपारी १२.४५, दि. २९ रोजी सकाळी ११.४० व दुपारी १२.४५ वाजता गाैण विवाह मुहूर्त आहेत. मात्र साखरपुड्यासाठी दि.३, दि.११, दि.१३, दि.१६, दि.२२, दि.२५, दि.२६, दि.२८, दि.२९ जुलै रोजी मुहूर्त आहेत. एकूण पाच दिवसांत लग्नाचे अकराच मुहूर्त आहेत. शासकीय निर्बंध शिथिल होत नसल्याने काहींनी दीपावलीनंतर लग्नसोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

या असतील अटी

लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू व वरांकडील मिळून अवघ्या २५ जणांनाच सहभागी होण्याची परवानगी.

वधू-वरांसह, सहभागी होणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.

लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापर सक्तीचा आहे. वाद्यवृंदासाठी मनाई केली आहे.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देताना, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

n अर्ज सादर केल्यानंतर प्रशासनाकडून शासकीय निर्बंधांची माहिती देऊन त्याचे पालन करण्यासाठी सूचित केले जाते.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देत असतानाच स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सूचना करण्यात येते, विवाह सोहळा पार पडेपर्यत इन कॅमेरा लक्ष ठेवले जाते, नियमावलींचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाते.

n लग्नसोहळ्यासाठी वाद्यवृंद, लाऊडस्पिकर, डीजे, वरात काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

लग्नासाठी शासकीय अटी-शर्थीच अधिक आहेत. लग्नासाठी मोजक्या माणसांची अट असल्याने त्यासाठी सभागृहाचे भाडे भरणे परवडणारे नाही. मंदिरे बंद आहेत, शिवाय पावसाळा असल्याने दारात लग्न करणे अशक्य असल्याने दीपावलीनंतरच मुलाचे लग्न उरकण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित तोपर्यत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

- एस. आर. काळे,

वधूपिता, रत्नागिरी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. निर्बंधात कसूर झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा भोगण्यापेक्षा मुलांचे लग्न तूर्तास रद्द केले आहे. भविष्यात शिथिलता जारी केल्यानंतर विवाह सोहळा उरकण्यात येईल. शेवटी हाैस एकदाच होते, त्यामुळे नंतरच नियोजन करता येईल.

- जे. डी. पावसे,

वरपिता, रत्नागिरी