शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय ...

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंधांचे पालन करण्यात येत आहे. लग्नसोहळ्यासाठीही प्रशासनाने अवघ्या २५ व्यक्तींनाच परवानगी दिली असून, लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळींसह वधू-वरांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कित्येक यजमानांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. दीपावलीनंतर विवाह सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

शुभमुहूर्त मोजकेच

जुलै महिन्यात चातुर्मास सुरू झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तही मोजकेच आहेत. दि. २२ रोजी सकाळी १०.४८ व दुपारी १२.०८ व १२.४५, दि. २५ रोजी सकाळी १०.३७ व ११.५६, दुपारी १२.४५, दि. २६ रोजी सकाळी ११.४४ व दुपारी १२.४५, दि. २९ रोजी सकाळी ११.४० व दुपारी १२.४५ वाजता गाैण विवाह मुहूर्त आहेत. मात्र साखरपुड्यासाठी दि.३, दि.११, दि.१३, दि.१६, दि.२२, दि.२५, दि.२६, दि.२८, दि.२९ जुलै रोजी मुहूर्त आहेत. एकूण पाच दिवसांत लग्नाचे अकराच मुहूर्त आहेत. शासकीय निर्बंध शिथिल होत नसल्याने काहींनी दीपावलीनंतर लग्नसोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

या असतील अटी

लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू व वरांकडील मिळून अवघ्या २५ जणांनाच सहभागी होण्याची परवानगी.

वधू-वरांसह, सहभागी होणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.

लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापर सक्तीचा आहे. वाद्यवृंदासाठी मनाई केली आहे.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देताना, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

n अर्ज सादर केल्यानंतर प्रशासनाकडून शासकीय निर्बंधांची माहिती देऊन त्याचे पालन करण्यासाठी सूचित केले जाते.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देत असतानाच स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सूचना करण्यात येते, विवाह सोहळा पार पडेपर्यत इन कॅमेरा लक्ष ठेवले जाते, नियमावलींचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाते.

n लग्नसोहळ्यासाठी वाद्यवृंद, लाऊडस्पिकर, डीजे, वरात काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

लग्नासाठी शासकीय अटी-शर्थीच अधिक आहेत. लग्नासाठी मोजक्या माणसांची अट असल्याने त्यासाठी सभागृहाचे भाडे भरणे परवडणारे नाही. मंदिरे बंद आहेत, शिवाय पावसाळा असल्याने दारात लग्न करणे अशक्य असल्याने दीपावलीनंतरच मुलाचे लग्न उरकण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित तोपर्यत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

- एस. आर. काळे,

वधूपिता, रत्नागिरी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. निर्बंधात कसूर झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा भोगण्यापेक्षा मुलांचे लग्न तूर्तास रद्द केले आहे. भविष्यात शिथिलता जारी केल्यानंतर विवाह सोहळा उरकण्यात येईल. शेवटी हाैस एकदाच होते, त्यामुळे नंतरच नियोजन करता येईल.

- जे. डी. पावसे,

वरपिता, रत्नागिरी