शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:38 IST

Republic Day Ratnagiri- कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले.

ठळक मुद्देकोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब रत्नागिरीत प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा

रत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले.रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर अनिल परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची प्रमुख उपस्थिती होती.कोविड-१९ च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा मी यावेळी आवर्जून उल्लेख करतो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आता लसीकरण सुरु झाले आहे. याची व्यवस्थित आखणी व नियोजन करण्यात आलेले आहे. तरीही कोरोना संपलेला नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन ही त्रिसुत्री पुढेही सुरू ठेवावी, असे सांगितले.परब म्हणाले की, कोरोना काळात नियोजन निधी प्राधान्याने कोरोनासाठी खर्ची पडला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात पूर्ण निधी देऊन अडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या सागरी किनाऱ्यांचा विकास करुन आगामी काळात हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे असे ॲड. अनिल परब म्हणाले. यावेळी पोलीसदल तसेच इतर पथकांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. शीघ्र कृती दलाचे एक प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले.पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते कोविड -१९ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोविड योध्दांचे, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत खेळाडू, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनRatnagiriरत्नागिरी