शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘जैतापूर’साठी प्रसंगी सत्ता सोडू

By admin | Updated: April 15, 2015 01:14 IST

विनायक राऊत : प्रकल्पाविरोधात शिवसेना व्यापक लढा उभारणार

राजापूर : फ्रान्ससमवेत झालेला करार केंद्र सरकारला महत्त्वाचा वाटत असला तरी आम्हाला जैतापूरवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध लढणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिली आहे. आता तर निर्णायक लढाईची वेळ आली आहे. हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत घालवून लावण्यासाठी यापुढे व्यापक स्वरूपाचा लढा उभारून त्यासाठी प्रसंगी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल, पण माघार घेणार नाही, असा हल्ला शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चढविला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत तेथील अरेवा कंपनीशी एल अ‍ॅण्ड टी कंपनीचा सामंजस्याचा करार घडवून आणला होता. त्याचे प्रकल्प परिसरात जोरदार पडसाद उमटले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा शिवसेना हा सत्तेतील भागीदार असून, भाजपने जैतापूर प्रकल्पाला पोषक भूमिका घेतल्याने शिवसेना संतप्त झाली. त्यानंतर सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी साखरीनाटे येथे जाऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छिमारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छिमार नेते अमजद बोरकरही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्प येणार, याची कुणकुण लागल्यापासून येथील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांनी प्राणपणाने प्रकल्पाविरुद्ध लढा सुरूच ठेवला आहे. त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला. यापूर्वी अनेक जनआंदोलनात सक्रिय सहभागही नोंदवला. मागील सरकारप्रमाणेच विद्यमान केंद्र सरकारने जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. तसेच फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी सामंजस्य करार केल्यामुळे आता या प्रकल्पातील अडथळे दूर होऊन अणुऊर्जा प्रकल्पाला लागणारे अभियांत्रिकी उत्पादन देशातच निर्माण होणार आहे, तर अरेवा कंपनीकडून अत्याधुनिक फोर्जिंग तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या त्या करारानंतर शिवसेना आक्रमक बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. फ्रान्सशी झालेला करार सरकारला मोठा वाटत असला तरी आम्हाला प्रकल्पग्रस्त मोठे वाटतात. त्यांचे जीवन आमच्यासाठी मोलाचे आहे. म्हणूनच आम्ही आजवर येथील प्रकल्पग्रस्तांसमवेत राहिलो आहोत आणि यापुढेही राहू, असा विश्वास खासदार राऊत यांनी दिला. आम्ही जैतापूरवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या हितासाठी प्रसंगी सत्ता सोडू, पण आता गप्प बसणार नाही, असे बजावत खासदार राऊत यांनी भविष्यात केवळ प्रकल्प परिसरच नाही तर गावागावांत जनजागृती करत जैतापूर प्रकल्पाविरुद्ध तीव्र लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार राजन साळवी यांनीही केंद्र शासनावर तुफान टीका केली. आमच्या भावी पिढीसाठी व त्यांच्या रक्षणासाठी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प इथून हटलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विजेचा तुटवडा जाणवत असेल तर कोयनेच्या चौथ्या टप्प्याला गती द्या, अशीही त्यांनी मागणी केली. यापुढे आमचे आंदोलन याहून अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला. मच्छिमारांच्या हितासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी अमजद बोरकर यांनी केली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध घोषणा दिल्या. या बैठकीला पंचायत समितीचे सदस्य दीपक नागले, रेखा कोंडेकर, राजन कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)