शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:15 IST

रत्नागिरी जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीनमोर्चा, आंदोलनातून असंतोष

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

विविध विकास प्रश्न लोंबकळत पडले आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलने यातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तरीही राजकीय पक्षांमध्ये हुतूतू सुरू आहे. त्यामुळे या समस्यांवर उत्तर घेणारे सक्षम राजकीय नेतृत्वच जिल्ह्यात उरले नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न, समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. राज्यात अन्यत्र राजकीय पक्षांच्या नेत्यांची विकासकामांसाठी, त्यांच्या भागातील समस्या सोडविण्यासाठी एकी दिसून येते, लॉबी दिसून येते. त्यासाठी पक्षभेद बाजुला ठेवला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरून एकत्र येण्याचा इतिहास आजही राजकीय नेते, कार्यकर्त्यांना निर्माण करता आलेला नाही.जनतेच्या जिव्हाळ्याच्या सामायिक प्रश्नांसाठी येथील आमदार, खासदार एकत्र येत नाहीत आणि त्यांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणणारे सक्षम नेतृत्वही जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचा डोंगर झाला असून, सामान्यांच्या या समस्यांचा कोणाला कळवळाच नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांच्याकडे आहे. संयमी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चिपळूण विभागात गुहागरचे आमदार व माजी पालकमंत्री भास्कर जाधव म्हणजे धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात.

चिपळुणात सेनेचे आमदार सदानंद चव्हाण कार्यरत आहेत, तर दापोली मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम व राजापूरमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी कार्यरत आहेत. खासदार विनायक राऊत व अनंत गीते हे खासदार म्हणून जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत.

रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु विकासाच्या प्रश्नांवर हे प्रभावी लोकप्रतिनिधी एकत्र येत नाहीत, हा जनतेचा आरोप आहे. जिल्ह्यात रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. चौपदरीकरणातही अनेक अडथळे येत आहेत. आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. परंतु प्रभावी नेतृत्त्वाची वानवा असल्याची टीका होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण