शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:15 IST

रत्नागिरी जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीनमोर्चा, आंदोलनातून असंतोष

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

विविध विकास प्रश्न लोंबकळत पडले आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलने यातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तरीही राजकीय पक्षांमध्ये हुतूतू सुरू आहे. त्यामुळे या समस्यांवर उत्तर घेणारे सक्षम राजकीय नेतृत्वच जिल्ह्यात उरले नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न, समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. राज्यात अन्यत्र राजकीय पक्षांच्या नेत्यांची विकासकामांसाठी, त्यांच्या भागातील समस्या सोडविण्यासाठी एकी दिसून येते, लॉबी दिसून येते. त्यासाठी पक्षभेद बाजुला ठेवला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरून एकत्र येण्याचा इतिहास आजही राजकीय नेते, कार्यकर्त्यांना निर्माण करता आलेला नाही.जनतेच्या जिव्हाळ्याच्या सामायिक प्रश्नांसाठी येथील आमदार, खासदार एकत्र येत नाहीत आणि त्यांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणणारे सक्षम नेतृत्वही जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचा डोंगर झाला असून, सामान्यांच्या या समस्यांचा कोणाला कळवळाच नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांच्याकडे आहे. संयमी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चिपळूण विभागात गुहागरचे आमदार व माजी पालकमंत्री भास्कर जाधव म्हणजे धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात.

चिपळुणात सेनेचे आमदार सदानंद चव्हाण कार्यरत आहेत, तर दापोली मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम व राजापूरमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी कार्यरत आहेत. खासदार विनायक राऊत व अनंत गीते हे खासदार म्हणून जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत.

रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु विकासाच्या प्रश्नांवर हे प्रभावी लोकप्रतिनिधी एकत्र येत नाहीत, हा जनतेचा आरोप आहे. जिल्ह्यात रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. चौपदरीकरणातही अनेक अडथळे येत आहेत. आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. परंतु प्रभावी नेतृत्त्वाची वानवा असल्याची टीका होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण