शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कोरोना खर्चासाठी नेत्यांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा पगार उसना घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला ...

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला लॉकडाऊन करु नये म्हणून विरोध, आंदोलने करुन लॉकडाऊन हाणून पाडणे, बेधडकपणे सण साजरे करणे, मास्क न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे, या निष्काळजीपणाची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागणार आहे. वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व अजूनही वाढणार आहे. यावर उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सर्व नेत्यांचे महिन्याचे मानधन व सर्व कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार उसना घ्यावा व व्याजासह दिवाळीत परत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक यांनी वर्षभर अनेक कळा सोसल्या आहेत. कोरोना आपत्तीची तीव्रता लक्षात घेता राजकीय पुढारी व कर्मचारी एखाद्या महिन्याचे मानधन व पगार व्याजासह उशिरा मिळणार असेल तर निश्चित कर्तव्य म्हणून कळ सोसतील, असा विश्वास आर्ते यांनी व्यक्‍त केला आहे. प्रचंड प्रमाणावर होत असलेल्या खर्चासाठी तातडीने पैसे उपलब्ध करण्यासाठी अशा पद्धतीची उपाययोजना राबविण्यात यावी. यासाठी सर्वांनीच आग्रही मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक, संस्था, संघटना आपापल्या पद्धतीने कोरोना संकटाला सामोरे जात असताना नेते व कर्मचाऱ्यांनीही काही कालावधीसाठी थोडी कळ सोसून या संकटात एकमेकांना मदत करावी, अशी अपेक्षा आर्ते यांनी व्यक्‍त केली आहे.