शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राज्यात आघाडी मात्र वाॅर्डात बिघाडा, स्वबळाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नांदत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नांदत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढविण्याचा निर्णय मित्रपक्षांनी घेतला आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतही मित्रपक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राज्यात आघाडी असली तरीही शहरातील वाॅर्डात ‘बिघाडी’च पाहायला मिळणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शहरात एकूण १५ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून एक पुरुष व एक महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका मुदतीतच होण्याची शक्यता असून दि. २२ डिसेंबरला नवीन नगराध्यक्ष विराजमान होण्याची शक्यता आहे. आरक्षणानंतर जागा वाटप होणार आहे. राज्यात आघाडी असली तरी सेनेच्या जागा अधिक असल्यामुळे जागा वाटपावरून मित्रपक्षात ‘बिघाडी’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेचे वर्चस्व

नगरपरिषदेमध्ये २३ उमेदवार शिवसेनेचे असल्याने वर्चस्व सेनेचे आहे. राष्ट्रवादीचे चार उमेदवार आहेत. सहाजिकच जागा वाटपावरून युती होणे अशक्य आहे. कार्यकर्त्यांना नाराज करणे कुठल्याच पक्षाला मान्य नाही. त्यामुळे राज्याचा पॅटर्न रत्नागिरीत लागू होणे अशक्य असून स्वतंत्र निवडणुका अटळ आहेत.

नगरसेवक निवडणूक

शहरात १५ प्रभाग असून प्रत्येक वाॅर्डातून एक पुरुष व एक स्त्री उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे ३० उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र निवडणूक किंवा नगरसेवकांतूनच नगराध्यक्ष निवडणूक याबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित असून, जनतेमध्येही उत्सुकता आहे.

दोन मते द्यावी लागणार

पंधरा प्रभागासाठी दोन उमेदवार निवडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्येकी दोन मते द्यावी लागणार आहेत. नगराध्यक्ष निवडणूक जर स्वतंत्र झाली तर मात्र तिसरे मतही नागरिकांना द्यावे लागणार आहे. मात्र याबाबतच निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

नागरिकांचा लागतो विकासाला हातभार

प्रत्येक शहराचा नागरिक हा करदाता असल्यामुळे विकासाला हातभार नागरिकांचा लागतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. विकासाचा अजेंडा घेऊन पक्ष आश्वासने देत असतात. नागरिकांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

- प्रमोद कोनकर.

जनकल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रतिनिधी नागरिकांमधून निवडून दिला जातो. मात्र, निवडून आलेनंतर त्यांना विकासाचा विसर पडतो. अजेंड्यावरील विकास दूरच राहतो.

- दिलावरअली नेवरेकर

स्वबळावर लढण्याची तयारी

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आमचे मित्र असलेल्या पक्षांकडून योग्य जागांवर मागणी झाली, दोन्ही पक्षांत जागा वाटपामध्ये तडजोड झाली तरच एकत्र; अन्यथा ‘स्वबळावर’ निवडणुका लढविणार आहोत. जागा वाटपावेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहोत.

- बिपीन बंदरकर, शहराध्यक्ष, शिवसेना

राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निवडणुकांसाठी मित्र पक्षाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही. ‘स्वबळावर’ निवडणुका लढविण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन नक्की घेऊ.

- बशीर मुर्तूझा, प्रांतीक सदस्य, राष्ट्रवादी पक्ष

शहराची स्थिती जनता पाहत आहे. शहराला दोन नगराध्यक्ष लाभले; परंतु जनतेला न्याय मात्र मिळालेला नाही. विकासाचा अजेंडा घेऊनच भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे नगरपरिषद निवडणूक लढविणार आहे. याबाबत वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांसमवेत विचारविनिमय सुरू आहे.

- सचिन करमरकर, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष