शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

By admin | Updated: May 14, 2016 23:55 IST

२० मेपासून समाप्ती : अन्य राज्यांतूनही आंब्याची आवक सुरु

रत्नागिरी : जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेला आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. कोकणातून बुधवारी वाशी मार्केटला ९२ हजार पेट्या विक्रीस गेल्या होत्या. येत्या २० मेपासून हापूस आंबा हंगाम संपणार असला, तरी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून आंब्याची आवक सुरू झाली आहे.गेल्या पाच वर्षात हापूसला विविध नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाला आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्याने हंगामाच्या आधी आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे जपणूक केल्यामुळेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत शेतकऱ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. शिवाय खर्चही भरपूर करावा लागतो. आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधन खर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तुटपूंजी आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याला मोहोरही उशिरा आला. हवेतील गारठ्यामुळे मोहोरप्रक्रिया सातत्याने होत राहिल्याने फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. जेमतेम २५ ते ३० टक्के पीक शिल्लक राहिले.जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आला.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, नंतर आंब्याची आवक मंदावली. परंतु, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढू लागली. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसबरोबर पायरी तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून बदामी, केशर, लालबाग, राजापुरी, बैंगनपल्ली, तोतापुरी आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९० ते ९२ हजार पेट्या दररोज विक्रीला येत आहेत. मात्र, हापूसचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. ८०० ते २००० रुपये दराने आंबापेटीची विक्री सुरू आहे. कॅनिंगला २५ ते ३० रुपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे. मात्र, उत्पादनात घट झाल्याने आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. २० मेपर्यंत आंबा संपणार असल्याचे आंबा उत्पादकांचे मत आहे. २० मेनंतर किरकोळ स्वरूपात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. कर्नाटक व अन्य राज्यांतील आंब्याचे आगमन बाजारपेठेत झाले आहे. त्यामुळे हापूसच्या यंदाच्या हंगामाची लवकरच सांगता होणार आहे.रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री करत ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. गतवर्षी २५ मे रोजी हापूस आंब्याचा हंगाम संपला होता. मात्र, यावर्षी तत्पूर्वीच हापूस हंगाम संपणार आहे. सध्या हापूसच्या शेवटच्या सत्रातील पेट्या वाशी मार्केटला पाठवण्याचे काम सुरु आहे. (प्रतिनिधी)नुकसानीच : पाच दिवस अगोदर निरोपगेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच दिवस अगोदरच हापूसचा हंगाम संपुष्टात येणार आहे. यंदा हापूस उशिराने बाजारात दाखल झाला आणि हंगाम लवकर संपत आहे. त्यामुळे हापूसचे यंदाचे वास्तव्य हे खूपच कमी झाले आहे. यंदा हापूसचा दर चढा असला तरीही बागायतदार नुकसानीतच आहेत.आवक मंदावलीपरराज्यातील आंब्याची आवक ही हापूससाठी परतीचे संकेत देणारी पहिली बाब असते. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये हळूहळू हापूसची आवक मंदावली आहे.