शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जवान जयेंद्र तांबडे यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:14 IST

चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.मंगळवारी रात्री उशिराने ताम्हणमळा येथे जयेंद्र तांबडे यांचे पार्थिव आणण्यात आले. तांबडे ...

चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.मंगळवारी रात्री उशिराने ताम्हणमळा येथे जयेंद्र तांबडे यांचे पार्थिव आणण्यात आले. तांबडे परिवाराला सैनिकी परंपरेचा वारसा लाभला आहे. तांबडे यांचे चुलत बंधूही सैन्यात आहेत. त्यांनी व त्यांच्या परिवाराने या प्रसंगाला धीराने तोंड दिले. बुधवारी सकाळी ११ वाजता ताम्हणमळा येथील स्मशानभूमीत जवान जयेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा निकम, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्ययात्रेवेळी ‘जयेंद्र तांबडे अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. ताम्हणमळा स्मशानभूमीत रत्नागिरीहून आलेल्या पोलीस पथकाने सलामी दिली. यानंतर पोलीस व प्रशासनातर्फे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाला हे वीरमरणच आले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आणि श्रध्दांजली वाहिली.