शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘प्रवासी वाढवा’ अभियानात लांजा आगार अव्वल

By admin | Updated: April 19, 2017 13:05 IST

९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १९ : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात आले. जानेवारी ते मार्चअखेर तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवत असताना आगारनिहाय प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगाराने उद्दिष्ट पूर्ण करून विभागात अव्वल क्रमांक मिळवला आहे.‘प्रवासी वाढवा अभियान’ संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी राबवण्यात आले. जानेवारी ते मार्च तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगारासाठी ८ लाख ४३ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. परंतु लांजा आगाराने ९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक करून संपूर्ण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राजापूर आगारासाठी ७ लाख ४ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट असताना ७ लाख ५२ हजार प्रवासी मिळवले आहेत. दापोली आगारासाठी ८ लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट होते. परंतु आगाराने ८ लाख ५६ हजार प्रवासी मिळविले आहेत. राजापूर आगाराने उद्दिष्टापेक्षा ४८ हजार व दापोली आगाराने १८ हजार अधिक प्रवासी मिळवून बक्षिसाच्या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.खेड आगाराला ११ लाख ४६ हजारांचे उद्दिष्ट असताना ११ लाख ९ हजार प्रवासी मिळवले आहेत. चिपळूण आगारासाठी १६ लाख ८४ हजाराचे उद्दिष्ट होते. पैकी १६ लाख ५८ हजार प्रवासी मिळवले. गुहागरसाठी ९ लाख ८७ हजाराचे उद्दिष्ट असताना ९ लाख ६७ प्रवासी मिळवले. देवरूख आगारासाठी १५ लाख ८३ हजारांचे उद्दिष्ट होते, पैकी १४ लाख ८१ हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. रत्नागिरी आगाराला २६ लाख ३८ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, पैकी २३ लाख ४० हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. मंडणगड आगारासाठी ४ लाख ६५ हजाराचे उद्दिष्ट असताना ३ लाख ८५ हजार प्रवाशी मिळविण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी विभागासाठी एक कोटी ९ लाख १७ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, मात्र, एक कोटी ३ लाख ५६ हजार प्रवासी मिळविण्यात यश आले. (प्रतिनिधी)