शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

‘प्रवासी वाढवा’ अभियानात लांजा आगार अव्वल

By admin | Updated: April 19, 2017 13:05 IST

९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १९ : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात आले. जानेवारी ते मार्चअखेर तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवत असताना आगारनिहाय प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगाराने उद्दिष्ट पूर्ण करून विभागात अव्वल क्रमांक मिळवला आहे.‘प्रवासी वाढवा अभियान’ संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी राबवण्यात आले. जानेवारी ते मार्च तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगारासाठी ८ लाख ४३ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. परंतु लांजा आगाराने ९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक करून संपूर्ण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राजापूर आगारासाठी ७ लाख ४ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट असताना ७ लाख ५२ हजार प्रवासी मिळवले आहेत. दापोली आगारासाठी ८ लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट होते. परंतु आगाराने ८ लाख ५६ हजार प्रवासी मिळविले आहेत. राजापूर आगाराने उद्दिष्टापेक्षा ४८ हजार व दापोली आगाराने १८ हजार अधिक प्रवासी मिळवून बक्षिसाच्या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.खेड आगाराला ११ लाख ४६ हजारांचे उद्दिष्ट असताना ११ लाख ९ हजार प्रवासी मिळवले आहेत. चिपळूण आगारासाठी १६ लाख ८४ हजाराचे उद्दिष्ट होते. पैकी १६ लाख ५८ हजार प्रवासी मिळवले. गुहागरसाठी ९ लाख ८७ हजाराचे उद्दिष्ट असताना ९ लाख ६७ प्रवासी मिळवले. देवरूख आगारासाठी १५ लाख ८३ हजारांचे उद्दिष्ट होते, पैकी १४ लाख ८१ हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. रत्नागिरी आगाराला २६ लाख ३८ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, पैकी २३ लाख ४० हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. मंडणगड आगारासाठी ४ लाख ६५ हजाराचे उद्दिष्ट असताना ३ लाख ८५ हजार प्रवाशी मिळविण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी विभागासाठी एक कोटी ९ लाख १७ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, मात्र, एक कोटी ३ लाख ५६ हजार प्रवासी मिळविण्यात यश आले. (प्रतिनिधी)