शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

लांजा ग्रामीण रुग्णालय आजही डॉक्टर्सविना...

By admin | Updated: June 5, 2015 00:21 IST

जबाबदार अधिकारीच नाही : शासनाची डोळेझाक होत असल्याबद्दल संताप व्यक्त

लांजा : तीन ते चार महिने लांजा ग्रामीण रुग्णालयात जबाबदार डॉक्टर नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असतानाही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. लांजा ग्रामीण रुग्णालय मुंबई - गोवा महामार्गावर आहे. १८ फेब्रुवारी २०१५ रोजी येथे कार्यरत असणारे डॉक्टर येथील त्यांचा कार्यकाळ संपल्याने निघून गेले. त्यानंतर आजपर्यंत येथे डॉक्टर उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. गेले तीन ते चार महिने डॉक्टर नसल्याने महामार्गावर होणारे अपघात, गुन्हे, इतर रुग्णांना जवळच असणाऱ्या पाली ग्रामीण रुग्णालयात अथवा रत्नागिरी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करावा लागतो आणि तक्रार द्यावयाची असेल तर पुन्हा लांजा पोलिस ठाण्यात यावे लागते. शहराच्या ठिकाणी असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाह्यरुग्ण विभागात दररोज १०० ते १५० पर्यंत रुग्णसंख्या असते. मात्र, गेले तीन ते चार महिने या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने रुग्ण आल्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी पाठवले जात असल्याने आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. मुंबई - गोवा महामार्गावर राजापूर - ओणी सोडल्यानंतर पालीपर्यंत एकही शासकीय रुग्णालय नसल्याने कोणत्याही रुग्णाला पाली किंवा रत्नागिरीच गाठावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.लांजा ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणचे रु्णालय असल्याने ओणी ते पाली या दरम्यान अपघात झाले तर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्ण आणले जातात. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व लगत असणाऱ्या गावातील लोकांचा विचार करता लांजा ग्रामीण रुग्णालय अतिशय महत्वाचे आहे.लांजा ग्रामीण रुग्णालयात इतर दवाखान्यातील डॉक्टर यांच्या हंगामी ड्युट्या लावल्या जातात. मात्र ते आपल्या दवाखान्यातील सेवा बजावण्याशिवाय ते लांजा येथे येवू शकत नाही. यामुळे येथे ग्रामीण भागातून आलेला रुग्ण ताटकळत उभा राहून खाजगी रुग्णालयाची वाट धरतो. सध्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत ते कोणत्या रुग्णाची हमी देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी उपचार होत नसल्याने एखाद्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्ण न तपासता रत्नागिरी किंवा पाली शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करुन नंतर आपली तक्रार देण्यासाठी लांजा पोलीस स्टेशनला यावे लागते. यासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे तत्काळ डॉक्टरांची उपलब्धता करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)1लांजा येथील रूग्णालयात महामार्गावरील अपघातग्रस्त अनेक रूग्ण दाखल केले जातात. मात्र, येथे जबाबदार वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे होणारे हाल कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे मत लांजा, राजापूर तालुक्यातून व्यक्त केले जात आहे. 2लांजा रूग्णालयात असलेले डॉक्टर्स ड्युटीज लावतात व त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने असलेल्या डॉक्टर्सवर ताण पडत असून, अशा डॉक्टर्सकडून तत्काळ उपाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.