शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलन, शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:42 IST

रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलनअतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे नुकसान

रत्नागिरी : शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे भूस्खनाचे प्रकार सुरूच आहेत. २००६ मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन सुमारे ४-५ एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायती देखील उद्ध्वस्त झाली आहे. भूस्खलनाच्या धोक्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच करणे सोडून दिले आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी त्यावेळी तातडीने या भागाची पाहणी केली होती. भूवैज्ञानिक स्तरावरूनही या प्रकारची दखल घेण्यात आली होती. रिंग लॅण्ड स्लाईड प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करून उपाययोजनेसाठी पाठवण्यात आला होता.सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपयोजना झाली काँक्रीटचा धूपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे १५ ते २० लाख खर्च झालेत. मात्र, पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.

अतिवृष्टीमुळे सुमारे १०० फूट लांब आणि १५ ते २० फूट उंच जमीन खचली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. याठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, आणि आता भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून नुकसान झाले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी