शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लोकचळवळीचा अभाव

By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST

गुहागर तालुका : पिण्याच्या पाण्याचे संकट

शृंगारतळी : यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने उन्हाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, नदी-नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. यामुळे पातळी वाढून काही प्रमाणात का होईना पाणीटंचाईवर मात करता येईल, अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवीत झाली आहे. मात्र, शृंगारतळीसारखे ठिकाण बंधारे बांधण्याच्या लोकचळवळीपासून अद्याप वंचित असल्याचे दिसत आहे. बंधारे बांधण्याच्या दृष्टीकोनातून शृंगारतळीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्हाभरात शासनाचे सर्व विभाग व राजकीय पदाधिकारी बंधारे बांधण्याच्या कामात गुंतलेले आहेत. गुहागर तालुक्यातही प्रशासन, राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने १००० बंधारे बांधण्यात येणार आहेत. बंधारे बांधण्यासाठी खासकरून कृषी विभागाला शेवटपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. शासनाचे इतर विभागही बंधाऱ्यांसाठी पाण्यात उतरतील. मात्र, कृषी विभागाला याकडे जादा लक्ष द्यावे लागेल, तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकेल. गुहागर तालुक्यात १२२ गावात एक हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले, तर प्रत्येक गावातील नदी - नाल्यावर आठ ते नऊ बंधारे बांधावे लागणार आहेत. त्यासाठी ६५ ग्रामपंचायतींना लोकचळवळ उभी करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. गुहागर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ शृंगारतळी मात्र बंधाऱ्यापासून अद्याप वंचित असल्याचे चित्र आहे. तळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला दक्षिण - उत्तर हंगामी नद्या वाहतात. या नद्यांच्या परिसरातील जमिनीत मुबलक पाणी आहे. याठिकाणच्या विहिरी ही उन्हाळ्यात पाण्याने डबडबत असत. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांपासून विहिरींच्या पाण्याची पातळी घटून तळ दिसू लागला आहे. कारण दिवसेंदिवस येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. सध्या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर असणाऱ्या विहिरी व कुपनलिकांमधून संपूर्ण शृंगारतळीला पाणी पुरवठा होत आहे. मोडका आगर धरणात मुबलक पाणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीची जलस्वराज्य पाणीपुरवठा कोटीची योजना बंद पडलेली आहे. रत्नागिरी गॅस पॉवरकडे जाणाऱ्या पाईपलाईनमधून मिळणारे पाणीही आता बंद झाले आहे. त्यामुळे शृंगारतळी येथील वाढत्या लोकवस्तीमुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे कौंढर रोड, वेळंब रस्ता, रोशन मोहल्ल्यातून वाहणारी हंगामी नदी व बाजारपेठेतील कोकणरत्न हॉटेलजवळून वाहणाऱ्या नदीवर कायमस्वरुपी बंधारे बांधण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने शृंगारतळीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शृंगारतळी वेळंबरोड येथील नदीचे पाणी सुकण्यापूर्वी येथे बंधारे बांधण्याची गरज आहे. (वार्ताहर)लाभदायक : पाणीटंचाईवर मात करता येणे शक्यपावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे सावट पसरणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे रौद्ररूप लक्षात घेऊन शासनाने गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होऊन पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे. पाणी अडविल्याने पाणीटंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे बंधारे लाभदायक ठरणार आहेत.ग्रामस्थांची अनास्थारत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावात ग्रामस्थांची अनास्था समोर येत आहे. त्यामुळे या गावात अजूनही बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतलेली नाही.