शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

लोकचळवळीचा अभाव

By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST

गुहागर तालुका : पिण्याच्या पाण्याचे संकट

शृंगारतळी : यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने उन्हाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, नदी-नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. यामुळे पातळी वाढून काही प्रमाणात का होईना पाणीटंचाईवर मात करता येईल, अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवीत झाली आहे. मात्र, शृंगारतळीसारखे ठिकाण बंधारे बांधण्याच्या लोकचळवळीपासून अद्याप वंचित असल्याचे दिसत आहे. बंधारे बांधण्याच्या दृष्टीकोनातून शृंगारतळीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्हाभरात शासनाचे सर्व विभाग व राजकीय पदाधिकारी बंधारे बांधण्याच्या कामात गुंतलेले आहेत. गुहागर तालुक्यातही प्रशासन, राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने १००० बंधारे बांधण्यात येणार आहेत. बंधारे बांधण्यासाठी खासकरून कृषी विभागाला शेवटपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. शासनाचे इतर विभागही बंधाऱ्यांसाठी पाण्यात उतरतील. मात्र, कृषी विभागाला याकडे जादा लक्ष द्यावे लागेल, तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकेल. गुहागर तालुक्यात १२२ गावात एक हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले, तर प्रत्येक गावातील नदी - नाल्यावर आठ ते नऊ बंधारे बांधावे लागणार आहेत. त्यासाठी ६५ ग्रामपंचायतींना लोकचळवळ उभी करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. गुहागर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ शृंगारतळी मात्र बंधाऱ्यापासून अद्याप वंचित असल्याचे चित्र आहे. तळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला दक्षिण - उत्तर हंगामी नद्या वाहतात. या नद्यांच्या परिसरातील जमिनीत मुबलक पाणी आहे. याठिकाणच्या विहिरी ही उन्हाळ्यात पाण्याने डबडबत असत. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांपासून विहिरींच्या पाण्याची पातळी घटून तळ दिसू लागला आहे. कारण दिवसेंदिवस येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. सध्या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर असणाऱ्या विहिरी व कुपनलिकांमधून संपूर्ण शृंगारतळीला पाणी पुरवठा होत आहे. मोडका आगर धरणात मुबलक पाणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीची जलस्वराज्य पाणीपुरवठा कोटीची योजना बंद पडलेली आहे. रत्नागिरी गॅस पॉवरकडे जाणाऱ्या पाईपलाईनमधून मिळणारे पाणीही आता बंद झाले आहे. त्यामुळे शृंगारतळी येथील वाढत्या लोकवस्तीमुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे कौंढर रोड, वेळंब रस्ता, रोशन मोहल्ल्यातून वाहणारी हंगामी नदी व बाजारपेठेतील कोकणरत्न हॉटेलजवळून वाहणाऱ्या नदीवर कायमस्वरुपी बंधारे बांधण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने शृंगारतळीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शृंगारतळी वेळंबरोड येथील नदीचे पाणी सुकण्यापूर्वी येथे बंधारे बांधण्याची गरज आहे. (वार्ताहर)लाभदायक : पाणीटंचाईवर मात करता येणे शक्यपावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे सावट पसरणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे रौद्ररूप लक्षात घेऊन शासनाने गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होऊन पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे. पाणी अडविल्याने पाणीटंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे बंधारे लाभदायक ठरणार आहेत.ग्रामस्थांची अनास्थारत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावात ग्रामस्थांची अनास्था समोर येत आहे. त्यामुळे या गावात अजूनही बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतलेली नाही.