शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

वीस हेक्टरवर अळीचा हल्ला

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

पावसाने मारले : भातशेती धोक्यात, रोपे पिवळी पडली, शेतकऱ्यापुढे संकट उभे

रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रमुख पीक भात असून, पावसाअभावी भातशेती धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यांतील २० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणची रोपे पिवळी पडून वाळू लागली आहेत, तर काही ठिकाणी भातरोपांवर करपा रोग पडला आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटिका एका रात्रीत नष्ट होते. राजापूर तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांच्या चार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. लांजा तालुक्यातील १५९ शेतकऱ्यांच्या ७.०९ हेक्टर क्षेत्रावर तसेच संगमेश्वर तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या ९ हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. राजापूर तालुक्यातील बाधित क्षेत्रावर कीटकनाशकांची फवारणी करून २.७५ हेक्टर क्षेत्र तसेच लांजा तालुक्यातील प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात आला आहेजिल्ह्यातील ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. मात्र, त्यासाठी ७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी करण्यात आली आहे, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाअभावी भातशेती पिवळी पडू लागली आहे. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धरणाच्या, विहिरीच्या पाण्याने भातशेती लावण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, कडकडीत उन्हामुळे भिजवलेले क्षेत्र वाळत आहे. हळव्या, गरव्या, निमगरव्या भातबियाण्यांचा शेतकऱ्यांनी वापर केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने शेतीची अवस्था बिकट आहे. जुलै सुरू झाला असून, दुबार पेरणी करणे आता शक्य होणार नाही. कृषी विभागाकडे हळव्या जातीचे २९१ क्विंटल, निमगरवे ७५ क्विंटल, तर गरवे १५ क्विंटल भात बियाणे शिल्लक आहे. हळव्या जातीचे भात दुबार पेरणीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, निमगरवे, गरवे भात वापरणे आता शक्य नाही. या सर्व प्रकारामुळे भातशेती धोक्यात आली आहे. (प्रतिनिधी)