शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

कोयना अवजल प्रश्नी चौकशी झालीच पाहिजे : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. याविषयी लोकांच्या मनात असलेला संशय कोणत्याही परिस्थितीत दूर करायला हवा आणि त्याची जबाबदारी शासनाचीच आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तटकरे हे शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी तटकरे म्हणाले, आपल्या माहितीनुसार अतिवृष्टी, भरतीचे पाणी व कोयना अवजल या तीन कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, कोयना अवजलविषयी वेगवेगळी माहिती पुढे येत असेल तर लोकांच्या मनात संशय असता कामा नये. त्याची चौकशी केली जाईल. तसेच पूरग्रस्त भागातील बाधित कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळायला हवी. तेव्हा पंचनाम्याची प्रक्रिया ज्या भागात पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी मदत पुरविण्याविषयी सूचना दिल्या जातील.

याशिवाय खेड-पोसरे येथे दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देताना त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने तिवरे धरणाचे काम होण्याची गरज आहे. त्याचाही प्रभाव चिपळूणच्या पूरपरिस्थितीवर होताना दिसत आहे. रायगडमध्ये नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारल्यानंतर पूररेषेवर नियंत्रण आले आहे. त्याच पद्धतीने चिपळुणात प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.