शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

फणसापाठोपाठ कोकणातील सीताफळाची रोपे परदेशात

By मनोज मुळ्ये | Updated: November 14, 2022 12:44 IST

सात दिवस पाणी आणि मातीशिवाय राहू शकतील, अशी प्रक्रिया करून ही ३०० रोपे केवळ २ खोक्यांमधून पाठवण्यात आली.

रत्नागिरी : लांजाचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी फणसाच्या रोपांपाठोपाठ आता सीताफळांची रोपेही परदेशात पाठवली आहेत. या माध्यमातून व्यवसायाचे एक मोठे दालन देसाई यांनी खुले केले आहे.फणसाच्या विविध जाती लावून नवी कृषिक्रांती करणारे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी २० दिवसांपूर्वीच फणसाची रोपे परदेशात पाठवली. प्रथमच असा प्रयोग झाला. आता त्यापाठोपाठ त्यांनी सीताफळाची रोपेही मॉरिशसला पाठवली आहेत. सीताफळे खूपदा देशातून परदेशात गेली आहेत; पण यावेळी चक्क त्याची रोपे परदेशात गेली आहेत. ज्यांनी फणसाची रोपे नेली होती, ते मॉरिशसमधील शेतकरी उदेश यांनीच ही रोपे नेली आहेत.फणसाप्रमाणेच सीताफळाची ३०० रोपे माती व पाण्याविना पाठवण्यात आली आहेत. सात दिवस पाणी आणि मातीशिवाय राहू शकतील, अशी प्रक्रिया करून ही ३०० रोपे केवळ २ खोक्यांमधून पाठवण्यात आली आहेत. त्यांचं वजन फक्त ७ किलो इतकंच झालं आहे.कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण शहराची वाट धरतात; मात्र मिथिलेश देसाई यांनी कृषी क्षेत्रावरच भर देत त्यातील नवनवे पर्याय शोधले आहेत. फणस आणि सीताफळापाठोपाठ आता लवकरच काजूची रोपे परदेशात पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुळात विविध पद्धतीच्या व्यावसायिक लागवडीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहेच, शिवाय रोपांची निर्यात करून त्यांनी त्यातील आणखी एक पर्याय खुला करून दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी