शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कोकण रेल्वे : आश्वासने हवेत विरली...

By admin | Updated: October 7, 2014 23:49 IST

प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावरच, अनेक प्रश्न अजून जैसे थे!

एजाज पटेल - फुणगूस -कोकण रेल्वे आली आणि स्वप्न साकार झाले, हे वाक्य केवळ फलकावर लिहिण्यासाठीच शोभादायक असून, आजही अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेत नोकरी मिळवण्यापासून वंचितच आहेत. कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून रेल्वे धावत असली तरी याचा प्रत्यक्ष लाभ कोकणपेक्षा अन्य राज्यानाच अधिक होत आहे. कोकणवासीयांना संघर्ष केल्याशिवाय कोकण रेल्वेने काहीच दिले नाही. कोकण रेल्वेकडून होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबणे, स्थानिक कष्टकरी प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळणे, रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स संगनमत करुन परप्रांतीयांना देणे, आवश्यक असताना जादा गाड्या न सोडणे, रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर न करणे, यासह अनेक कारणांमुळे कोकणवासीयांना कोकण रेल्वे प्रशासनाचा खरा चेहरा दिसून आला. मात्र, संघटित होऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी योग्य दिशा न मिळाल्यामुळे कोकणवासीयांच्या मनातील उद्रेक उग्ररुप धारण करु शकला, असे मत व्यक्त होताना दिसत आहे.कोकण रेल्वे मार्ग ज्या गावांमधून गेला आहे, त्या सर्वच गावांमधून ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेतून बाहेर रुळावर पडणारा मैला आणि सर्व प्रकारचा कचरा ही मोठी समस्या बनली आहे. यामुळे कोकणात सर्वाधिक प्रदूषण हे त्यामुळे होत असल्याचे एका पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये दोन स्वच्छतागृह असतात. प्रत्येक डब्यातून किमान १५० प्रवासी सफर करतात. प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर हा अनिवार्यच आहे. मात्र, रेल्वेत प्रवाशांसाठी असणारे स्वच्छतागृह रेल्वेमार्ग ज्या गावातून गेला आहे, त्यांच्यासाठी अस्वच्छता पसरवत आहे. स्वच्छतागृहातील मलमुत्रांच्या विसर्जनासाठी वेगळी सोय नसल्याने हा मैला रेल्वे रुळांवर सर्वाधिक प्रदूषण करत आहे.चहा देण्यासाठी असणारी कुल्हडची योजना बारगळल्यानंतर आता सर्रास प्लास्टिकचे कप वापरले जात आहेत. हे प्लास्टिक कप रेल्वे रुळावर सर्वाधिक प्रदूषण करणारे ठरत आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर जेवणाच्या प्लेट्स तसेच प्लास्टिकचे कप सर्व गाड्यांतून जातात.कोकणातील गाव निर्मल ग्राम होण्यामध्ये रुळावरुन फिरणाऱ्या रेल्वेचा अडसर हे असल्याने प्रदूषण मंडळ, पर्यावरण विभाग आदींनी कोकण रेल्वेला प्रदूषण रोखण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कोकणातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केली आहे. कोकण रेल्वेविरुद्धच्या प्रदूषण रोखण्याच्या लढ्यात केवळ कोकण रेल्वे मार्ग ज्या ग्रामपंचायत हद्दीतून गेला आहे, त्या ग्रामपंचायतींचाच समावेश नसून, सर्वच ग्रामपंचायती या लढ्याला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे केले तरच या लढ्याला यश येईल.