शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:49 IST

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

ठळक मुद्देकोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

आरक्षणाच्या डब्यात अजूनही जनरल तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण आणखीनच वाढले असून, गाडीतील वीज आणि पंखे बंद असण्याची समस्या डोकेदुखी ठरत आहे. गाडीतील शौचालयातही विजेच्या समस्येबरोबरच पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. बहुतांशी सगळ्याच समस्यांनी भरून वाहणाऱ्या या गाड्या म्हणजे केवळ रूपडे बदलले पण समस्या तशाच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोकणासाठी भूषणावह असणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास कोकणातील माणसांसाठी दिवसेंदिवस अधिकच महाग होत चालला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या या गाड्यांचा कोकणी जनतेला फायदा कमीच होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीला कायमच वर्दळ असते. कोकणची कन्या म्हणून ओळख असणाऱ्या या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या सुरूवातीपासून प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन्ही गाड्यांचे रूपडे आता बदलण्यात आले आहे.

आधी या गाड्यांना आयसीएफ कोच होते. आता नव्या स्वरुपात या दोन्ही गाड्यांना अधिक लांबीचे व अधिक प्रवासी क्षमता असलेले एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. या एलएचबी कोचमध्ये एलईडी दिवे, हायड्रॉलिक शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, डिस्क बे्रक प्रणाली, उत्तम सस्पेंशन या सुविधा देण्यात आल्या आहेत.या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले असले तरी या गाड्यांमधील समस्या तशाच आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या गाड्यांपेक्षा जुनं तेच सोनं असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतून प्रवास करताना जनरल डब्याचे तिकीट घेणारे प्रवासी थेट आरक्षित डब्यांतूनच प्रवास करतात. या प्रवाशांमुळे जादा पैसे मोजून सुखाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नीटसा प्रवासही करता येत नाही. या डब्यातील तिकीट तपासनीसदेखील काही करू शकत नाहीत, हे विशेष.गाडीतील पंख्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, बहुतांशी पंखे बंदावस्थेतच असतात. जे सुरू असतात, त्या पंख्यांची हवाच प्रवाशांना लागत नाही. शौचालयातील दिवे तर पूर्णत: बंदावस्थेत असतात तसेच शौचालयात पाणीच नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की, कोकण रेल्वेच्या देखाव्यासाठी आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गाडीतील या समस्यांमुळे जुन्याच गाड्या बऱ्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतील प्रवाशांमधून या समस्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.गाडीचे डबे वाढविण्याऐवजी केले कमीगाडीची प्रवासी क्षमता वाढवताना या गाड्यांच्या बोगींची संख्या पूर्वीच्या २४ वरून आता २२ करण्यात आली आहे. जनरल डब्यांची संख्या कमी केल्याने हे प्रवासी थेट आरक्षित डब्यात शिरतात. त्यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात. गाडीला चांगले भारमान असूनही डब्यांची संख्या का वाढवली जात नाही, असा सवाल केला जात आहे.रेल्वे प्रशासन गंभीरच नाहीगतिमान प्रशासनाचे स्वप्न पाहणाऱ्या शासनाने प्रवाशांनी केलेल्या ट्विटनंतर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. यापूर्वी कोकण रेल्वेकडून तशी दखलही घेतली जात होती. मात्र, आता प्रवाशांनी मांडलेल्या समस्येची दखलच घेतली जात नसल्याचे दिसत आहे. प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासन गंभीरच नसल्याचे स्पष्ट होत आहे.मोबाईल पॉइंट बंदावस्थेतगाडीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. आरक्षित डब्यात मोबाईल चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. पण, त्यासाठी ठेवण्यात आलेले स्वीच बंदावस्थेतच आहेत. त्यामुळे चार्जिंग करायचे कसे? याबाबत तिकीट तपासनीसांना विचारले असता, गाडी नवीनच आहे, असे कसे होऊ शकते असे आश्चर्यकारक उत्तर देतात.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी