शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कोकणची हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 3, 2014 02:14 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राज्यात अव्वल स्थान

रत्नागिरी / टेंभ्ये : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. फेब्रुवारी २०१२ पासून सलग तीन वर्षे राज्यात अव्वल राहण्याचा बहुमान कोकण विभागीय मंडळाने मिळविला आहे. राज्यात अव्वल राहण्याची हॅट्ट्रिक साधणारे कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील एकमेव विभागीय मंडळ आहे. फेब्रुवारी / मार्च २०१४ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेला एकूण ३२ हजार ३९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८५ टक्के असून, राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ही टक्केवारी तीन टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागानंतर दुसरे स्थान ९१.८५ टक्क्यांसह अमरावती विभागाने, तर तिसरे स्थान ९१.५४ टक्केनिकालासह कोल्हापूर विभागाने पटकावला आहे. कोकण विभागातून विज्ञान शाखेमध्ये ७,७४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी ७,२९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील १०,४८४ विद्यार्थ्यांपैकी ९,६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेमधील १२,१७१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ११,८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एमसीव्हीसी शाखेमधील २००३ विद्यार्थ्यांपैकी १९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून १७ हजार ९३९ मुले व १५ हजार ३५७ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. यापैकी १५ हजार ८४८ मुले व १४ हजार ८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाणे राज्यात अव्वल आहे.मुलींबरोबर मुलांनीही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विभागातून ९३.०१ टक्केमुले उत्तीर्ण झाली असून, हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत कोकण विभागातील मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण जवळपास चार टक्क्यांनी अधिक आहे. (वार्ताहर) तीन शाखा राज्यात प्रथम स्थानावर कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखांचा निकाल राज्यात प्रथम स्थानावर आहे. कला शाखेचा निकाल ९२.२५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२८ टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल ९५.९६ टक्केलागला आहे. यापैकी कला व वाणिज्य शाखेचा निकाल राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ३ ते ४ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष बाब म्हणजे चारही शाखांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. अशा पद्धतीचा निकाल असणारे कोकण विभागीय मंडळ एकमेव आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात अव्वल गैरमार्ग मुक्त परीक्षा घेण्यात कोकण विभागीय मंडळ राज्यात अव्वल स्थानावर आहे. कोकण विभागातून केवळ ११ गैरप्रकारांची नोंद झाली असून, राज्यात हे सर्वांत कमी प्रमाण आहे. नागपूर विभागातून सर्वाधिक ३२६ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. कोकण विभागातील ४७ परीक्षा केंद्रांपैकी ३५ परीक्षा केंद्रांना भरारी पथकानी भेट दिली आहे.