शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

कोकणची हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 3, 2014 02:14 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राज्यात अव्वल स्थान

रत्नागिरी / टेंभ्ये : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. फेब्रुवारी २०१२ पासून सलग तीन वर्षे राज्यात अव्वल राहण्याचा बहुमान कोकण विभागीय मंडळाने मिळविला आहे. राज्यात अव्वल राहण्याची हॅट्ट्रिक साधणारे कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील एकमेव विभागीय मंडळ आहे. फेब्रुवारी / मार्च २०१४ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेला एकूण ३२ हजार ३९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८५ टक्के असून, राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ही टक्केवारी तीन टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागानंतर दुसरे स्थान ९१.८५ टक्क्यांसह अमरावती विभागाने, तर तिसरे स्थान ९१.५४ टक्केनिकालासह कोल्हापूर विभागाने पटकावला आहे. कोकण विभागातून विज्ञान शाखेमध्ये ७,७४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी ७,२९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील १०,४८४ विद्यार्थ्यांपैकी ९,६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेमधील १२,१७१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ११,८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एमसीव्हीसी शाखेमधील २००३ विद्यार्थ्यांपैकी १९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून १७ हजार ९३९ मुले व १५ हजार ३५७ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. यापैकी १५ हजार ८४८ मुले व १४ हजार ८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाणे राज्यात अव्वल आहे.मुलींबरोबर मुलांनीही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विभागातून ९३.०१ टक्केमुले उत्तीर्ण झाली असून, हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत कोकण विभागातील मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण जवळपास चार टक्क्यांनी अधिक आहे. (वार्ताहर) तीन शाखा राज्यात प्रथम स्थानावर कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखांचा निकाल राज्यात प्रथम स्थानावर आहे. कला शाखेचा निकाल ९२.२५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२८ टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल ९५.९६ टक्केलागला आहे. यापैकी कला व वाणिज्य शाखेचा निकाल राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ३ ते ४ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष बाब म्हणजे चारही शाखांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. अशा पद्धतीचा निकाल असणारे कोकण विभागीय मंडळ एकमेव आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात अव्वल गैरमार्ग मुक्त परीक्षा घेण्यात कोकण विभागीय मंडळ राज्यात अव्वल स्थानावर आहे. कोकण विभागातून केवळ ११ गैरप्रकारांची नोंद झाली असून, राज्यात हे सर्वांत कमी प्रमाण आहे. नागपूर विभागातून सर्वाधिक ३२६ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. कोकण विभागातील ४७ परीक्षा केंद्रांपैकी ३५ परीक्षा केंद्रांना भरारी पथकानी भेट दिली आहे.