शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

देवाचा डोंगर समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: May 11, 2016 23:58 IST

खेड तालुका : पदरमोड करून केलेला रस्ता वाहून गेला; पाण्यासाठी आजही पायपीट

खेड : खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच समस्या पूजलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामस्थांनी पदरमोड करून तयार केलेला रस्ताही पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाला सुगीचे दिवस कधी येणार? असा सवाल होत आहे.तुळशीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. रस्तादेखील कच्चा आणि दगडधोंड्यातून जाणारा आहे. रामदास कदम यांच्या कारकिर्दीत हा रस्ता तयार झाला आहे़ मात्र, त्यानंतर या कच्च्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणीही पाहिले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन हा रस्ताच आता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहने न्यायची कशी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर गाव हे वीस किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे. या धनगरवाडीत दहा घरे आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांना अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही़ या वाडीत लहानसा पाण्याचा पऱ्या आहे़ त्यातील पाणी हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरते़ मात्र, त्यानंतर या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वाडी डोंगरावर वसलेली असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना खाली तुळशी गावात यावे लागते़ अन्यथा खासगी वाहनातून जामगे येथून पाणी आणावे लागते.़ तसेच ज्या ग्रामस्थांकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावापर्यंत चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर ग्रामस्थांना पार करावे लागते. पाण्यासाठी तीन-तीन खेपाही माराव्या लागत आहेत़ रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवस पुरेल एवढे पाणी एकावेळेला भरावे लागत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धनगरवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रतिवर्षी जाणवत आहे़ पाऊस सुरू होईपर्यंत या धनगरवाड्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ ग्रामस्थांना जनावरांनाही पाणी द्यावे लागते. टंचाईच्या काळात पाणी पुरविणे अवघड होत असले तरीही कसलीही तमा न बाळगता ग्रामस्थांना हे करावे लागत आहे़ ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. मात्र, टँकर वाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे़ टँकर वाडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (प्रतिनिधी)जामगेचा आधार : धनगरवाड्यात पाणीच नसल्याने चार किलोमीटरवरून वाहतूकतुळशी देवाचा डोंगर गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून चार किलोमीटर अंतरावरील जामगे गावातध्ये जावे लागत आहे़ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने ही पायपीट सुरू झाली आहे़ जामगे गावातील हे पाणी इथल्या लोकांना मोठा आधार ठरले आहे.