शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

देवाचा डोंगर समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: May 11, 2016 23:58 IST

खेड तालुका : पदरमोड करून केलेला रस्ता वाहून गेला; पाण्यासाठी आजही पायपीट

खेड : खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच समस्या पूजलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामस्थांनी पदरमोड करून तयार केलेला रस्ताही पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाला सुगीचे दिवस कधी येणार? असा सवाल होत आहे.तुळशीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. रस्तादेखील कच्चा आणि दगडधोंड्यातून जाणारा आहे. रामदास कदम यांच्या कारकिर्दीत हा रस्ता तयार झाला आहे़ मात्र, त्यानंतर या कच्च्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणीही पाहिले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन हा रस्ताच आता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहने न्यायची कशी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर गाव हे वीस किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे. या धनगरवाडीत दहा घरे आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांना अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही़ या वाडीत लहानसा पाण्याचा पऱ्या आहे़ त्यातील पाणी हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरते़ मात्र, त्यानंतर या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वाडी डोंगरावर वसलेली असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना खाली तुळशी गावात यावे लागते़ अन्यथा खासगी वाहनातून जामगे येथून पाणी आणावे लागते.़ तसेच ज्या ग्रामस्थांकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावापर्यंत चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर ग्रामस्थांना पार करावे लागते. पाण्यासाठी तीन-तीन खेपाही माराव्या लागत आहेत़ रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवस पुरेल एवढे पाणी एकावेळेला भरावे लागत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धनगरवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रतिवर्षी जाणवत आहे़ पाऊस सुरू होईपर्यंत या धनगरवाड्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ ग्रामस्थांना जनावरांनाही पाणी द्यावे लागते. टंचाईच्या काळात पाणी पुरविणे अवघड होत असले तरीही कसलीही तमा न बाळगता ग्रामस्थांना हे करावे लागत आहे़ ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. मात्र, टँकर वाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे़ टँकर वाडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (प्रतिनिधी)जामगेचा आधार : धनगरवाड्यात पाणीच नसल्याने चार किलोमीटरवरून वाहतूकतुळशी देवाचा डोंगर गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून चार किलोमीटर अंतरावरील जामगे गावातध्ये जावे लागत आहे़ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने ही पायपीट सुरू झाली आहे़ जामगे गावातील हे पाणी इथल्या लोकांना मोठा आधार ठरले आहे.