शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

देवाचा डोंगर समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: May 11, 2016 23:58 IST

खेड तालुका : पदरमोड करून केलेला रस्ता वाहून गेला; पाण्यासाठी आजही पायपीट

खेड : खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच समस्या पूजलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामस्थांनी पदरमोड करून तयार केलेला रस्ताही पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावात वाहन जाणेही मुश्किल झाले आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाला सुगीचे दिवस कधी येणार? असा सवाल होत आहे.तुळशीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. रस्तादेखील कच्चा आणि दगडधोंड्यातून जाणारा आहे. रामदास कदम यांच्या कारकिर्दीत हा रस्ता तयार झाला आहे़ मात्र, त्यानंतर या कच्च्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणीही पाहिले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन हा रस्ताच आता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहने न्यायची कशी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर गाव हे वीस किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे. या धनगरवाडीत दहा घरे आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांना अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही़ या वाडीत लहानसा पाण्याचा पऱ्या आहे़ त्यातील पाणी हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरते़ मात्र, त्यानंतर या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वाडी डोंगरावर वसलेली असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना खाली तुळशी गावात यावे लागते़ अन्यथा खासगी वाहनातून जामगे येथून पाणी आणावे लागते.़ तसेच ज्या ग्रामस्थांकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावापर्यंत चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर ग्रामस्थांना पार करावे लागते. पाण्यासाठी तीन-तीन खेपाही माराव्या लागत आहेत़ रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवस पुरेल एवढे पाणी एकावेळेला भरावे लागत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या धनगरवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रतिवर्षी जाणवत आहे़ पाऊस सुरू होईपर्यंत या धनगरवाड्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ ग्रामस्थांना जनावरांनाही पाणी द्यावे लागते. टंचाईच्या काळात पाणी पुरविणे अवघड होत असले तरीही कसलीही तमा न बाळगता ग्रामस्थांना हे करावे लागत आहे़ ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. मात्र, टँकर वाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचाही नाईलाज झाला आहे़ टँकर वाडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (प्रतिनिधी)जामगेचा आधार : धनगरवाड्यात पाणीच नसल्याने चार किलोमीटरवरून वाहतूकतुळशी देवाचा डोंगर गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून चार किलोमीटर अंतरावरील जामगे गावातध्ये जावे लागत आहे़ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने ही पायपीट सुरू झाली आहे़ जामगे गावातील हे पाणी इथल्या लोकांना मोठा आधार ठरले आहे.