शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

वडापाव विक्रेत्यास सुरीने भोसकले

By admin | Updated: October 10, 2015 23:49 IST

रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील घटना : बाचाबाचीतून हाणामारी

रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होऊन वडापाव व्यावसायिकाच्या अंगावर सुरीने जोरदार वार करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १०) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हरिश्चंद्र गोविंद पवार (वय ४०, रा. कारवांची वाडी, रत्नागिरी) हे रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात वडापावचा व्यवसाय करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते रेल्वेस्थानक परिसरात इतर रिक्षाचालकांसोबत थट्टामस्करी करीत होते. यावेळी संशयित आरोपी रिक्षाचालक नितीन पवार तेथे आला. हरिश्चंद्र पवार हे त्याला काहीतरी बोलले, या गैरसमजातून नितीन याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून त्याने हरिश्चंद्र यांच्या वडापावच्या गाडीवरील सुरी आणून डाव्या बरगडीवर वार केला. हरिश्चंद्र यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रात्रीच संशयित आरोपीस अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश धेंडे करीत आहेत. (वार्ताहर)