शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मुलीचा पाठलाग करणाऱ्यास बदडल

By admin | Updated: February 15, 2015 23:40 IST

अलोरेतील घटना : कुटुंबियांनाही धक्काबुक्की, सामानाची मोडतोडे

शिरगाव : आपल्या वडीलांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीकडे मोबाईल नंबर मागितला असता न दिल्याचे रागातून मोटर सायकलने पाठलाग करत जवळ जावून छेड काढल्याचा प्रकार काही युवकांनी केल्याची चर्चा समजताच, अलोरे वरची वाडी येथील तरुणांनी मोहल्ल्यात एकत्र जाऊन एका घरातील कुटुंबियांना धक्काबुुक्की केली, सामानाची मोडतोड व गाडीचे नुकसान करत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार दि. १४ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता घडला.दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दाखल झालेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून अलोरे मोहल्ल्यातील तिघांवर तर वरचीवाडी येथील १९ तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अलोरेतील फिर्यादीची मुलगीला गेल्या पंधरा दिवसांपासून वाटेवर छुपा पाठलाग सुरु होता. तोच प्रकार काल घडल्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने ३५४(५)(१)२४ अन्वये गुन्हा जाबांज खलील मुल्ला (१९), मुराद उस्मान बेबल (२१), वसीम कुंभार्लीकर यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.अलोरे मोहल्ला येथील हमन अब्दुल करीम मुल्ला (८७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपले नातू जाबांज याने गावातील मुलीची छेड काढली असा समज करुन १९ तरुणांनी पत्नी, सून व नात यांना धक्काबुक्की करुन गाडीचे नुकसान केले व ठार मारण्याची धमकी दिली. दोन्ही बाजूकडील जमाव पोलीस स्थानकात १५ रोजी सकाळपर्यंत होता. या घटनेची डीवायएसपी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक संपत पाटील यांचेकडे चर्चा करत होते.अखेर तक्रारी दाखल झाल्याने १९ तरुणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. प्रितम आंब्रे, तुषार चव्हाण, राकेश चव्हाण, सुशांत सुर्वे, दिनेश कदम, अमोल चव्हाण, राम मोहिते, सदाशिव मोहिते, नितेश चव्हाण, मोहन साळवी, चव्हाण, योगेश चव्हाण, यशवंत कदम, मोहन सकपाळ, संतोष चव्हाण, अनंत चव्हाण, संतोष कदम, अमित चव्हाण, राजेश चव्हाण अशी त्यांची नावे आहेत.या प्रकारामुळे अलोरेत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अद्याप तरी कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. (वार्ताहर)गाडीचेही जमावाने नुकसान केल्याची तक्रार.परस्परविरोधी तक्रारी दाखल.अलोरे परिसरात तणावाचे वातावरण.१९ तरूणांविरोधात गुन्हा दाखल.अद्याप कोणालाही अटक नाही.फिर्यादीच्या मुलीचा पंधरा दिवसांपासून सुरू होता पाठलाग.