शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खंडाळा-जाकादेवी- मासेगाव मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा-जाकादेवी-मासेगाव (निवळी) या मुख्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे गणेशोत्सव कालावधीतही भरले गेले ...

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा-जाकादेवी-मासेगाव (निवळी) या मुख्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे गणेशोत्सव कालावधीतही भरले गेले नाहीत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या महामार्गावरून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सभापती, विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांची ये- जा सुरू असूनही तेही शांत कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिंदल कंपनीकडून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागते आहे. दुचाकी, लहान कार, रिक्षा यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे गाड्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. आजारी व्यक्तींना या रस्त्यामुळे डॉक्टरांकडे नेणे-आणणेही फार जिकिरीचे होते. निवळी ते जाकादेवी हा दिवस-रात्र प्रवासाचा महत्त्वाचा महामार्ग आहे. जिंदलची अवजड वाहतूकही या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सुरू असते. असे असताना हा वाहतुकीच्या मार्गाकडे प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार का दुर्लक्ष करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खंडाळा-जाकादेवी-मासेगाव-निवळी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्य ऋतुजा जाधव प्रयत्नशील आहेत. अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच आरटीओ ऑफिस कार्यालय मात्र, त्यांची मागणीसंबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्णत्वास गेली नाही. निवळी जाकादेवी खंडाळा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे जर अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास या अपघाताला मेरिटाइन बोर्ड, जिंदल, सार्वजनिक बांधकाम विभाग, चौगुले कंपनी यांना जबाबदार धरले जाईल, असे ऋतुजा राजेश जाधव यांनी सांगितले.