शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापोली तालुक्यातील कवी केशवसुतांचे घर भग्नावस्थेत,  वळणे गावातील स्मृती कायम राहण्यासाठी प्रयत्न गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:46 IST

चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

ठळक मुद्देवैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणाऱ्या कवी केशवसुत यांचे वळणे येथे घर निसर्गरम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत आधुनिक कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुत यांची ओळख

दापोली : चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्यात दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्यप्रतिभेची खरी सुरुवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते.

निसर्गरम्य वळणे गावातून शांतपणे वाहणारी नदी, तेथील केवड्याचे बन, नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या झाडांनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत होऊन कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध सर्वदूर दरवळला. मात्र, केशवसुतांचे वास्तव्य असलेले वळणे गावातील हे घर सध्या भग्नावस्थेत असून, सद्यस्थितीत घराच्या पडलेल्या भिंती व घराच्या जोत्याचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत.

वळणे येथील केशवसुतांच्या घराच्या दुरुस्तीबाबत कवी मधुमंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रयत्न केले होते. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला याठिकाणी फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.

दापोलीमध्ये येणाऱ्या साहित्यप्रेमी पर्यटकांना आद्यकवी केशवसुत यांचे वळणे गावातील घर पाहण्याची इच्छा असते. मात्र, दुर्दैवाने आज हे घर जमीनदोस्त झाल्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होते. 

स्मृती जपणे गरजेचेमालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नाने कवी केशवसुतांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक वेगळेपण असलेले स्मारक उभारण्यात आले आहे. मराठी साहित्य अजरामर केलेल्या तुतारीकार केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी वळणे (ता. दापोली) येथील भग्नावस्थेत असलेले केशवसुतांचे घर दुरुस्त करून स्मारक उभारल्यास साहित्यप्रेमी पर्यटकांना एक नवे दालन खुले होईल.- प्रशांत परांजपे,केंद्रीय कार्यवाह, कोमसाप.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी