शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील कापडगावाने ६६ वर्षे जतन केल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थींचे 

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2022 12:28 IST

कापडगाववासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत.

शोभना कांबळेरत्नागिरी : विश्वभूषण, क्रांतिसूर्य, परिवर्तनाचे महामेरू, घटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य अशा असंख्य उपाधींनी गौरविले गेलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. कापडगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील समता सैनिक दलाचे सदस्य असलेले या गावातील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे जतन या गावातील जनता भक्तिभावाने करीत आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या निधीतून या गावात भव्य बुद्धविहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यात हा चांदीचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे.बाबासाहेबांनी कामगारमंत्री असताना कामगारांच्या न्यायासाठी सतत लढा दिला. या चळवळीत गिरणी कामगारांचा सक्रिय सहभाग होता. चळवळीला व्यापक स्वरूप मिळाल्याने यातून समता सैनिक दलाची निर्मिती झाली. यात राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता. मुंबईतील प्रसिद्ध मफतलाल मिलमध्ये ते कामाला होते. या लढ्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना जवळून बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झाले. यात समता सैनिक दलाचे राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता.बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर राजाराम कांबळे त्यांचा अस्थिकलश आपल्या गावी कापडगाव बाैद्धवाडी येथे घेऊन आले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने वाडीत १ जानेवारी १९५७ साली छोटेसे बुद्धविहार उभारण्यात आले आणि हा अस्थिकलश या विहारात ठेवण्यात आला. कापडगाववासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत. राजाराम कांबळे यांचे याठिकाणी भव्य विहार उभारण्याचे स्वप्न होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले आहे. मात्र, वाडीतील साऱ्यांच्या एकोप्यामुळे आता त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.कापडगावात असलेल्या या ऐतिहासिक घटनेची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने २ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. यात तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली असून त्यासमोर बाबासाहेबांच्या अस्थींचा चांदीचा कलश ठेवण्यात आला आहे. शेजारी दोन मजल्यांची इमारतही उभारण्यात आली आहे. यात तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सभागृह तसेच येणारे भिक्खू गण, बौद्ध उपासक यांच्यासाठी विश्रामगृहाची सोय आहे. दुसऱ्या मजल्यावर विविध ग्रंथ आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके असलेले अद्ययावत वाचनालय उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.

 

कापडगाव येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहारालगतच्या इमारतीत या ग्रामपंचायतीला वाचनालय सुरू करायचे आहे. त्यासाठी त्यांना प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. प्रस्ताव आल्यानंतर तो मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी या स्वायत्त संस्थेकडे पाठविण्यात येईल. - यादव गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी