शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

कळंबणी रूग्णालयाचे शवागारच मृृतावस्थेत...

By admin | Updated: January 10, 2015 00:15 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : शासनस्तरावर लक्ष नसल्याने आता जबाबदारी कोण घेणार याकडे नजरा

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबणी येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. या रूग्णालयात शवागार यंत्रणा सध्या अस्तित्त्वातच नसल्याने गैरसोय होत आहे. सरकारने पाच वर्षांपूर्वी ८ लाख रूपये खर्च करून या रूग्णालयाला दिलेली शवपेटी गेल्या तीन वर्षांपासून धूळखात पडली आहे. ही शवपेटी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या शवागाराच्या उभारणीसाठी तातडीचे २ लाख रूपये उपलब्ध होत नसल्याने ही यंत्रणा बंद पडली आहे. आरोग्य खात्याच्या ग्रामीण भागातील रूग्णांच्या सोयीसाठी असलेल्या अशा रूग्णालय अवस्थेबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. १९ मार्चला भरणे येथील जगबुडी नदीवरील पुलावरून कोसळलेल्या आराम बस अपघातानंतर या रूग्णालयाच्या असुविधांबाबत मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. यंत्रणा आहे. मात्र, ती ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेत खोलीची उभारणी करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्याने हे कामही अपूर्ण राहिले आहे. हे मशीन उघड्यावर असल्याने या त्याला आता फिकट रंग प्राप्त झाला आहे. मशीनचा रंग उडाल्याने व गंज चढत असल्याने पावसाळ्यात रूग्णालयाच्या समस्यांमध्ये भर पडणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकामी लक्ष घालावे. कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींंद्र वायकर यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून रूग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या रूगणालयाला नवी झळाळी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात अनेक सोयी सुविधा नसल्याने रूग्णांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या ठिकाणी पुरविण्यात आलेल्या अनेक सुविधांचा लाभ रूग्णांना अजूनही मिळत नाही. तसेच येथील शवागाराची स्थिती गंभीर बनली आहे. शासनस्तरावर अनेकवेळा प्रयत्न करूनही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.