शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गातील कळणे भविष्यातील ‘माळीण’ रोखणार कसे? आता तरी राजकीय पक्ष शहाणे होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 00:22 IST

कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?

सावंतवाडी : कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?कि प्रत्येक जण आपले उखळ पांढरे करत राहिले त्यामुळेच आज अनेक कुटूंबाना आपली घरे वाºयावर सोडून दुसºयाकडे आसरा घ्यावा लागला याला जबाबदार कोण कारण तेव्हाचे समर्थक आजचे विरोधक असल्याने  आरोप प्रत्यारोप करून पुन्हा एकदा उरला सुरला डोंगर पोकरायला द्याचा असा तरी यांचा मनसुबा नाही असल्याचे दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पेटून उठणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी व दोडामार्ग चा काहि पट्टे हे मांयनिग क्षेत्र असल्याने त्यांची लीज यापूर्वीच वाटप करण्यात आली आहेत.रेडी येथील मांयनिग हे अनेक वर्षे चालते पण त्यांची कधी वाच्यता झाली नाही मात्र २००९ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील कळणे मध्ये मांयनिग होणार हे जेव्हा लक्षात आले तेव्हा अनेकांनी विरोध केला जनसुनावणी उधळून लावली मात्र नंतर हे मांयनिग तेथे झालेच यावरून मोठया राजकीय घडामोडी घडल्या आंदोलने झाली उपोषणे चालली मात्र यांचा कोणताही फरक तत्कालीन सरकारला पडला नाही अधिकाºयांना वर झाला नाही या सर्व घडामोडीत एक सुरक्षा रक्षकांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन कर्त्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले.त्यातून आज जरी सर्वजण निर्देष सुटले असले तरी तेव्हाचे भिती दायक वातावरण आणि मांयनिग समर्थकांची असलेली दहशत यामुळे आंदोलन ात पडलेली फुट यांचा सर्व फायदा मांयनिग कंपनीला झाल्याचे दिसून आले.

गेल्या दहा ते बारा वर्षात मांयनिग कंपनीचे मालक गब्बर झाले आणि जमिन मालक मात्र न्यायालयीन लढे लढतच असून कळणेचा डोंगर ही शोधवा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.याला जबाबदार कोण असाच प्रश्न पडत आहे.मांयनिग मध्ये मारण्यात आलेले मोठमोठे खडयाचे बांध फुटले आणि गुरूवारी माती आणि पाणी सरळ लोकांच्या घरात गेले आणि लाखो रूपयांंची हानी झाली झालेली हानी सरकार मांयनिग कंपनी देईल पण गेलेला निर्सग परत आणणार कोण मांयनिगच्या नादात अख्खे जंगल तुटले संपूर्ण पणे पर्यावरणाचा ºहास झाला याची जबाबदारी कोण घेणार ते समोर येत नाहीकारण कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय नेत्याचा पाझर फुटण्यास सुरूवात झाली पण हा पाझर फुटतना २००९ मध्ये आता  भाजप मध्ये असलेले अनेक नेते काँग्रेस मध्ये होते.आणि मांयनिग समर्थ क म्हणून प्रसिद्ध होते उद्योग आले पाहिजे बड्या मारतना आपलीच माणसे विकासा विरोधात असल्याचे दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते.

मग आता या नेत्याना हरीत लवाद का आठवतो त्यामुळे आता पर्यत कळणे मांयनिग च्या विरोधात जेवढे लढे उभे केले ते सर्व फोल ठरले तसेच हरीत लवादात जाणारे हे ऐकण्यापूरते चांगले पण प्रत्यक्षात कोण कोण जाणार हे येणार काळच ठरवेल पण हा डोंगर भविष्यातील माळीण पासून कसा रोखणार यांचा अभ्यास आता पासूनच अधिकाºयांनी करणे मात्र गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीlandslidesभूस्खलन