शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

‘मेघदूत’ व्याख्यान : यक्षाच्या कथेत काव्याचे सौंदर्य

रत्नागिरी : कालिदासाच्या मेघदूतातून शाप मिळालेल्या यक्षाची कथा सांगण्यात आली आहे. मात्र कालिदासाने ११६ श्लोकांमधून ही काव्य फुलवले आहे. त्यामुळे रसिकांना व वाचकांना त्याचे शब्दसौंदर्य तर कळते, असे प्रतिपादन धनश्री लेले यांनी केले.रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आयोजित ‘कालिदासाचे मेघदूत’ कार्यक़्रमात धनश्री लेले बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन, दाक्षायणी बोपर्डीकर उपस्थित होते.कालिदासाने स्वत:विषयी कोठेच काही लिहून ठेवलेले नाही. अतिशय मुर्ख माणूस प्रधानाने डावपेच रचून राजकन्येशी विवाह लावून दिला. मात्र हुशार हतबल झाले व तिने वटहुकूम काढून घराबाहेर पाठवले. घराबाहेर पडलेल्या या माणसाने कालिमातेची उपासना केली व कालिदास बनून परत आला. यातून त्यांनी कालिदासाचे थोडक्यात वर्णन करुन त्याच्या काव्याचे व रचनेची माहिती दिली. यक्षाचे वर्णन करताना कालिदासाने त्याला अस्तगमीत या शब्दाने वर्णवले. रामगिरीचे वर्णन करताना सुंदर हिरवाईने नटलेला पर्वत या शब्दात सांगून क्षीण व दुर्बल झालेला यक्ष काळा भिन्न मेघ पाहून हतबल होतो. परंतु अश्रू ओघळू न देता मेघाकडे विनवणी करतो. पत्नीला मेघाद्वारे निरोप पाठवण्यासाठी विनवणी करतो. एकूणच कालिदासाच्या काव्यामध्ये सौंदर्यता नटलेली आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)