शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:05 IST

CoronaVirus Ratnagiri-स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देकुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालनग्रामपंचायतीचा सक्रिय पुढाकार, ग्रामस्थांचे सहकार्य

अनिल कासारेलांजा : स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.लांजा शहरापासून १३ किलोमीटरवर काजरघाटी - पावस मार्गावर वसलेले कुर्णे गाव आहे. या कुर्णे गावात तीन महसुली गावे आहेत. कुर्णे महसूल गावाची लोकसंख्या ६८४, घडशी ४१७ तर पड्यार गावची लोकसंख्या ४५८ आहे. संपूर्ण कुर्णे गावची एकूण लोकसंख्या १ हजार ५५९ एवढी आहे.

गावामध्ये वरची मानेवाडी - गुरववाडी, खालची मानेवाडी - गुरववाडी, बौध्दवाडी, खाकेवाडी, कदमवाडी, ब्राह्मणवाडी, घडशीवाडी, सुतारवाडी, पड्येवाडी, दाभोलकरवाडी अशा एकूण १० वाड्या आहेत. ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून सार्वजनिक, धार्मिक, सामाजिक, विकासकामांच्या मुद्द्यावर सर्व ग्रामस्थ सलोख्याने कामे करतात. नुकताच कुर्णे ग्रामपंचायतीला माजी गृहमंत्री कै. आर. आर. तथा आबा पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कारही मिळाला आहे.कुर्णे गावचे बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे - मुंबई येथे कामाला आहेत. हे चाकरमानी गणपती उत्सव, गावची यात्रा व होळी सणाला आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावतात. सन २०२० मध्ये मार्च महिन्यात शिमगोत्सव असल्याने गावातील बरेचसे चाकरमानी गावात दाखल झाले होते. शिमगोत्सव संपतो न संपतो तोच देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे चाकरमानी गावातच अडकून पडले.

मुंबई - पुणे येथील कंपन्या बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांनी गावची वाट धरली. कोरोना कालावधीत निर्बंधांचे कडक पालन करून त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. याचे उत्तम नियोजन कुर्णे ग्रामपंचायतीने केले होते.महानगरातून आलेल्या चाकरमान्यांची जबाबदारी प्रत्येक वाडीवर व त्यांच्या कुटुंबीयांवर सोपविण्यात आली होती. वाडीतील बंद घरांमध्ये चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले जेवणाचे साहित्य व पाणी त्यांच्या कुटुंबीयांनी दिले आणि १४ दिवस त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे त्यांचा संपर्क येथील स्थानिक रहिवाशांशी आलाच नाही.

होम क्वारटाइन चाकरमान्यांची व्यवस्था तसेच ते स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी ग्रामपंचायत घेत होती. चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्यसेविका सई भुर्के, सुप्रिया बोंबले, आशासेविका आकांक्षा कासारे, पड्यारच्या अंगणवाडीसेविका अक्षदा कांबळे, कुर्णेच्या अंगणवाडीसेविका योगिता घडशी, घडशी गावच्या अंगणवाडीसेविका अश्विनी घडशी यांनी क्वारंटाइन चाकरमान्यांची आरोग्याच्या दृष्टीने दरदिवशी विचारपूस केली.

कुर्णेच्या सरपंच संजना पड्ये, उपसरपंच मोहन घडशी, सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील राजेश मोरे हे ग्राम कृतीदलाच्या माध्यमातून चाकरमान्यांकडून शिस्त पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवून होते. इतरत्र कोरोनोचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सुनियोजनामुळेच कुर्णे ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.ग्रामपंचायतीचे नियोजनलॉकडाऊन काळात ग्रामस्थांना भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी ना तोटा ना फायदा या तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस ग्रामस्थांना भाजीपाला घरपोच पुरविला. कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतीने तीन रिक्षा ठरवून दिल्या. त्या रिक्षाचालकांनी ग्रामस्थांना डॉक्टरकडे सोडायचे आणि त्यानेच पुन्हा घरी आणून सोडायचे ही जबाबदारी देण्यात आली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी