शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:05 IST

CoronaVirus Ratnagiri-स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देकुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालनग्रामपंचायतीचा सक्रिय पुढाकार, ग्रामस्थांचे सहकार्य

अनिल कासारेलांजा : स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले आहे.लांजा शहरापासून १३ किलोमीटरवर काजरघाटी - पावस मार्गावर वसलेले कुर्णे गाव आहे. या कुर्णे गावात तीन महसुली गावे आहेत. कुर्णे महसूल गावाची लोकसंख्या ६८४, घडशी ४१७ तर पड्यार गावची लोकसंख्या ४५८ आहे. संपूर्ण कुर्णे गावची एकूण लोकसंख्या १ हजार ५५९ एवढी आहे.

गावामध्ये वरची मानेवाडी - गुरववाडी, खालची मानेवाडी - गुरववाडी, बौध्दवाडी, खाकेवाडी, कदमवाडी, ब्राह्मणवाडी, घडशीवाडी, सुतारवाडी, पड्येवाडी, दाभोलकरवाडी अशा एकूण १० वाड्या आहेत. ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून सार्वजनिक, धार्मिक, सामाजिक, विकासकामांच्या मुद्द्यावर सर्व ग्रामस्थ सलोख्याने कामे करतात. नुकताच कुर्णे ग्रामपंचायतीला माजी गृहमंत्री कै. आर. आर. तथा आबा पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कारही मिळाला आहे.कुर्णे गावचे बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे - मुंबई येथे कामाला आहेत. हे चाकरमानी गणपती उत्सव, गावची यात्रा व होळी सणाला आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावतात. सन २०२० मध्ये मार्च महिन्यात शिमगोत्सव असल्याने गावातील बरेचसे चाकरमानी गावात दाखल झाले होते. शिमगोत्सव संपतो न संपतो तोच देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे चाकरमानी गावातच अडकून पडले.

मुंबई - पुणे येथील कंपन्या बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांनी गावची वाट धरली. कोरोना कालावधीत निर्बंधांचे कडक पालन करून त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. याचे उत्तम नियोजन कुर्णे ग्रामपंचायतीने केले होते.महानगरातून आलेल्या चाकरमान्यांची जबाबदारी प्रत्येक वाडीवर व त्यांच्या कुटुंबीयांवर सोपविण्यात आली होती. वाडीतील बंद घरांमध्ये चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले जेवणाचे साहित्य व पाणी त्यांच्या कुटुंबीयांनी दिले आणि १४ दिवस त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे त्यांचा संपर्क येथील स्थानिक रहिवाशांशी आलाच नाही.

होम क्वारटाइन चाकरमान्यांची व्यवस्था तसेच ते स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी ग्रामपंचायत घेत होती. चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्यसेविका सई भुर्के, सुप्रिया बोंबले, आशासेविका आकांक्षा कासारे, पड्यारच्या अंगणवाडीसेविका अक्षदा कांबळे, कुर्णेच्या अंगणवाडीसेविका योगिता घडशी, घडशी गावच्या अंगणवाडीसेविका अश्विनी घडशी यांनी क्वारंटाइन चाकरमान्यांची आरोग्याच्या दृष्टीने दरदिवशी विचारपूस केली.

कुर्णेच्या सरपंच संजना पड्ये, उपसरपंच मोहन घडशी, सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील राजेश मोरे हे ग्राम कृतीदलाच्या माध्यमातून चाकरमान्यांकडून शिस्त पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवून होते. इतरत्र कोरोनोचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सुनियोजनामुळेच कुर्णे ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.ग्रामपंचायतीचे नियोजनलॉकडाऊन काळात ग्रामस्थांना भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी ना तोटा ना फायदा या तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस ग्रामस्थांना भाजीपाला घरपोच पुरविला. कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतीने तीन रिक्षा ठरवून दिल्या. त्या रिक्षाचालकांनी ग्रामस्थांना डॉक्टरकडे सोडायचे आणि त्यानेच पुन्हा घरी आणून सोडायचे ही जबाबदारी देण्यात आली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी