शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

जवानोत्सवातून विद्यार्थ्यांची जवानांना आदरांजली

By admin | Updated: July 27, 2014 23:02 IST

दि न्यू एज्युकेशन सोसायटी व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराने कारगिल दिनाचे औचित्य साधून मशाल फेरी

रत्नागिरी : ‘अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ जिथे ना कुणी बांधिला पेटली ना वात’ अशा शब्दांत कवी कुसुमाग्रजांनी जवानांची व्यथा मांडली. यामुळे सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांची स्मृती राहावी, या हेतूने दि न्यू एज्युकेशन सोसायटी व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराने कारगिल दिनाचे औचित्य साधून मशाल फेरी काढली.कारगिल विजय दिन व आषाढ अमावास्येचे औचित्य साधून २६ रोजी सायंकाळी प्राथमिक विद्यामंदिरपासून मशाल फेरीला सुरुवात झाली. तत्पूर्वी शाळेमध्ये सुरेख रांगोळीसह पणत्या लाऊन दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. हिंदू संस्कृतीत आषाढ अमावास्येला महत्त्वाचे स्थान आहे. दु:ख दूर होऊन जीवन प्रकाशमय होण्यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते. मात्र, अलिकडे ‘गटारी’च्या नावाखाली वाट्टेल ते करण्याचे फॅड आले आहे. ही चुकीची प्रथा आहे. विद्यार्थ्यांना जवानांचे बलिदान व त्याचे महत्व समजावून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.एनसीसीच्या छात्रांनी मशाली घेतल्या होत्या. तसेच फाटक हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शहरातील अन्य नागरिक या फेरीमध्ये सहभागी झाले. लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य मुन्ना सुर्वे, जयंत प्रभूदेसाई, विशाखा भिडे, परुळेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)