शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जवानोत्सवातून विद्यार्थ्यांची जवानांना आदरांजली

By admin | Updated: July 27, 2014 23:02 IST

दि न्यू एज्युकेशन सोसायटी व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराने कारगिल दिनाचे औचित्य साधून मशाल फेरी

रत्नागिरी : ‘अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ जिथे ना कुणी बांधिला पेटली ना वात’ अशा शब्दांत कवी कुसुमाग्रजांनी जवानांची व्यथा मांडली. यामुळे सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांची स्मृती राहावी, या हेतूने दि न्यू एज्युकेशन सोसायटी व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराने कारगिल दिनाचे औचित्य साधून मशाल फेरी काढली.कारगिल विजय दिन व आषाढ अमावास्येचे औचित्य साधून २६ रोजी सायंकाळी प्राथमिक विद्यामंदिरपासून मशाल फेरीला सुरुवात झाली. तत्पूर्वी शाळेमध्ये सुरेख रांगोळीसह पणत्या लाऊन दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. हिंदू संस्कृतीत आषाढ अमावास्येला महत्त्वाचे स्थान आहे. दु:ख दूर होऊन जीवन प्रकाशमय होण्यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते. मात्र, अलिकडे ‘गटारी’च्या नावाखाली वाट्टेल ते करण्याचे फॅड आले आहे. ही चुकीची प्रथा आहे. विद्यार्थ्यांना जवानांचे बलिदान व त्याचे महत्व समजावून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.एनसीसीच्या छात्रांनी मशाली घेतल्या होत्या. तसेच फाटक हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शहरातील अन्य नागरिक या फेरीमध्ये सहभागी झाले. लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य मुन्ना सुर्वे, जयंत प्रभूदेसाई, विशाखा भिडे, परुळेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)