शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

ऊर्जामंत्र्यांचा जिल्ह्यात जनता दरबार

By admin | Updated: May 20, 2016 22:47 IST

अधिकाऱ्यांशी साधणार संवाद : शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत अधिकारी धारेवर

रत्नागिरी : वेळेवर काम पूर्ण करण्याकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीजबिलावर तोडगा काढण्याकरिता प्रत्येक फीडरवर ११ शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांची थकबाकी व अन्य प्रलंबित मुद्द्यांसाठी त्यांना काही अधिकार द्यावेत, या प्रस्तावाबाबत महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, ऊर्जा मंत्र्यांचे सल्लागार विश्वास पाठक उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील उदासीनतेबाबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी चांगलेच खडसावले. प्रत्येक झोनच्या मुख्य अभियंत्यांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक फिडरवर शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांना वीज भरण्यास जागरूक करणे तसेच आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकरण व आकडे टाकताना जीव गमवण्यासारखे प्रकार घडू नयेत, याकरिता शेतकऱ्यांचा गट उपयुक्त ठरेल, अशा सूचना दिल्या. अमरावती, अकोला, बारामती व औरंगाबाद या झोनमध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. तेथील अधिकाऱ्यांना संजीवकुमार यांनी धारेवर धरले. यापुढे कमीत कमी कालावधीत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन उभारण्याबाबत लवकरात लवकर टेंडर काढून योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ट्रान्सफॉर्मर भवनकरिता बेरोजगार इंजिनियरला प्राधान्य देण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सुचविले. राज्यात इन्फ्रा-१, इन्फ्रा-२, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, आयपीडीएससारख्या योजनांकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवणे व त्यांचे थकीत पैसे वेळेवर देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक शुक्रवार व शनिवारी विभाग व उपविभाग यांचे दौरे करून तेथील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तेथील ग्राहकांच्या वीज समस्यांचे निराकरण करावे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता ऊर्जामंत्री प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महावितरणचे सर्कल अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सशी जोडले गेले आहेत. यापुढे ऊर्जामंत्री थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विजेच्या धक्क्याने दगावण्याच्या घटनांबाबत काळजी घेतली तर ८० टक्के अपघात टाळले जाऊ शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागात लाइनमनद्वारे टिल्लू ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता लाइनमनला प्रशिक्षण देणे, त्यांना त्यांची जबाबदारी व केस स्टडीद्वारे त्यांच्यात संवेदनाशिलता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत संजीवकुमार यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)