शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

ऊर्जामंत्र्यांचा जिल्ह्यात जनता दरबार

By admin | Updated: May 20, 2016 22:47 IST

अधिकाऱ्यांशी साधणार संवाद : शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत अधिकारी धारेवर

रत्नागिरी : वेळेवर काम पूर्ण करण्याकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीजबिलावर तोडगा काढण्याकरिता प्रत्येक फीडरवर ११ शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांची थकबाकी व अन्य प्रलंबित मुद्द्यांसाठी त्यांना काही अधिकार द्यावेत, या प्रस्तावाबाबत महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, ऊर्जा मंत्र्यांचे सल्लागार विश्वास पाठक उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील उदासीनतेबाबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी चांगलेच खडसावले. प्रत्येक झोनच्या मुख्य अभियंत्यांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक फिडरवर शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांना वीज भरण्यास जागरूक करणे तसेच आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकरण व आकडे टाकताना जीव गमवण्यासारखे प्रकार घडू नयेत, याकरिता शेतकऱ्यांचा गट उपयुक्त ठरेल, अशा सूचना दिल्या. अमरावती, अकोला, बारामती व औरंगाबाद या झोनमध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. तेथील अधिकाऱ्यांना संजीवकुमार यांनी धारेवर धरले. यापुढे कमीत कमी कालावधीत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन उभारण्याबाबत लवकरात लवकर टेंडर काढून योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ट्रान्सफॉर्मर भवनकरिता बेरोजगार इंजिनियरला प्राधान्य देण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सुचविले. राज्यात इन्फ्रा-१, इन्फ्रा-२, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, आयपीडीएससारख्या योजनांकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवणे व त्यांचे थकीत पैसे वेळेवर देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक शुक्रवार व शनिवारी विभाग व उपविभाग यांचे दौरे करून तेथील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तेथील ग्राहकांच्या वीज समस्यांचे निराकरण करावे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता ऊर्जामंत्री प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महावितरणचे सर्कल अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सशी जोडले गेले आहेत. यापुढे ऊर्जामंत्री थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विजेच्या धक्क्याने दगावण्याच्या घटनांबाबत काळजी घेतली तर ८० टक्के अपघात टाळले जाऊ शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागात लाइनमनद्वारे टिल्लू ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता लाइनमनला प्रशिक्षण देणे, त्यांना त्यांची जबाबदारी व केस स्टडीद्वारे त्यांच्यात संवेदनाशिलता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत संजीवकुमार यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)